मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील विविध परिसरात दिनांक ९ एप्रिल रोजी अचानक झालेल्या गरपीट व अवकाळी पावसामुळे घोदडेव, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, बेलोना, यासह तालुक्यातील विविध परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आंबिया बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे चांगलेच नुकसान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य सचिन उमाळे, अतुल काकडे, मंगेश होले यांच्यासह शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
आधीच मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असतांना त्या संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात असतांना आता पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या गारपीटीमुळे मृग व आंबिया बहराच्या संत्राचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा विवीध रोगांमुळे सुकन्याच्या मार्गावर असतांना शेतकऱ्यांना उपाय योजना करण्यासाठी वन वन भटकावे लागत असूनशेतकरी संत्रा बाग वचविन्याच्या प्रयत्नात असतांना शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून शेतकरी करो या मरोच्या परिस्थितीत असतांना आता पुन्हा झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे आंबिया बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटांची मालिक सुरु आहे .
आधीच संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असतांना शेतकर्यांना अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले आहे. परिसरात गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेल्या भागातील संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे झाडाला लागलेल्या संत्र्यांचा सडाच खाली पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. झाडाला असलेल्या फळालाही मार लागल्यानं या मालाला भावही चांगला मिळणार नसल्यामुळे वर्षभराचं पीक हातचं गेल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाल्यामुळे शासनाने गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, सचिन उमाळे, अतुल काकडे, मंगेश होले, यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी शासनाला केली आहे.