उमरखेड:- (दि. ९ मार्च) शहरातील दलित वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मध्ये मागील तीन दिवसापासून नाली साफसफाई करणारे कर्मचारी आले नसल्यामुळे वार्डातील संपूर्ण सांडपाण्याच्या नाल्या घाणीने तुडुंब भरलेले दिसत आहेत.
त्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्यामुळे लहान मुलांना मलेरिया ताप येत असून वार्डामध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.
या अगोदरही नगरपालिका उमरखेड चे सी ओ जामनोर यांना फोन द्वारे संपर्क करून सांडपाण्याच्या नाल्या रोज साफ नाहीत तसेच रोज कर्मचारी साफसफाई करता येत नसल्याबाबतचे सांगत आले होती.
यावर मुख्याधिकारी यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे आज पुन्हा डॉ. आंबेडकर साम्राज्यात सापडलेला आहे.
…..
– नगरपालिकेने लोकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी..
नगरपरिषद फक्त मार्च एंडिंग च्या वसुलीत गुंग झाली आहे.
पण सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे काय..? असा सवाल भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी उपस्थित केलेला आहे.