Home चंद्रपूर विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त संस्कार घडवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातूनच होत असते – मुख्याध्यापक...

विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त संस्कार घडवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातूनच होत असते – मुख्याध्यापक संजय झुरमुरेरणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत निरोप समारंभ

61

 

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रह्मपुरी(दि. 19 एप्रिल):- आई वडिला सारखेच शिक्षकाचे नाते वर्गात असेपर्यंत विद्यार्थ्यांशी अतूट असते. त्याचबरोबर त्यांच्यावर संस्कार सुद्धा हे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जास्तीत जास्त घडवण्याचा प्रयत्न करतो त्यातूनच त्याच्या आयुष्याच्या खरी वळणाला सुरुवात होते, त्यानंतरच आयुष्यातील नव्या वाटा व नवीन दिशा व नवी स्वप्न त्याच्या बुद्धिमत्तेवर तो विकसित करू शकतो असे मौलिक विचार शाळेचे मुख्याध्यापक संजय झुरमुरे यांनी मांडले ,रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 19 एप्रिल 2023 रोजी वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विनोद दोनाडकर यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुज खोब्रागडे, अरविंद राऊत गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सडमाके तर आभार कृष्णा किरमिरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here