( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:- जिवती तालुका अतिदुर्गम डोंगर दरीचा भाग असल्याने या तालुक्यात उन्हाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात पाण्याची पाण्याची टंचाई निर्माण होत असते म्हणून तालुक्यातील शेणगाव ग्रामपंचायत या गावी पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये लोकांनाची पाण्यासाठी वन वन भटकंती थांबली पाहिजे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत अंदाजीत किंमत दोन कोटी सत्तेअंशी लक्ष रुपये इतकी रक्कमे मध्ये काम होणार आहेत नंदप्पा ग्रामपंचायत अंतर्गत बेलगाव ते शेणगांव ७ किलोमीटर अंतरावरून पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून आज दि.१७-१०-२०२३ रोजी शेणगांव ग्रामपंचायतचे उपसरपंच नरेश उर्फ नरसिंग हामणे यांच्या हास्ते पाण्याच्या टाकीचा भूमीपूजन करण्यात आले असून या भूमिपूजन कार्यक्रमात नंदाताई मुसने सदस्य, तानुबाई सदस्य, प्रल्हाद राठोड अध्यक्ष तंटामुक्त समिती, रमाकांत माने पोलिस पाटील, दत्तात्रय माने माजी सभापती पंचायत समिती राजुरा, गावातील नागरिक, ठेकेदार, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते




