रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि.17 एप्रिल):-
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरील एक थोर महापुरुष होते. ते आपले आयुष्य संपूर्ण दलित पिढीत व शोषित समाजाच्या उत्थानासाठी वाहिले. ते स्वतः करिता कधीच जगले नाही तर या बहुजन समाजासाठी जगले. खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाकरिता अहोरात्र मेहनत करून भारतीय समाजव्यवस्थेत समानता कसे प्रस्थापित करता येईल याकरिता संविधानात सर्व शोषित व वंचित घटकांसाठी विशेष तरतूद केली. जर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तीगत जीवन जगण्याचे ठरविले असते तर श्रीमंतीच्या थाटात जगले असते यात शंका नाही. परंतु ते समाजाचा उत्थान हाच उद्याचा मजबूत भारत देश आहे. हे तत्वज्ञान घेऊन सामाजिक मूल्यांची समतेची बीजे रोवली. हे कार्य समाजासमोर यावे समाजाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी . या उदात्त हेतूने आम्ही उदापूर येथे रक्तदान व अवयवदान कार्यक्रमाचे आयोजन केले. असे मौलिक मार्गदर्शन यावेळी प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ सिध्दार्थ टेभुर्णे, प्रकाशजी सांगोळकर, प्रा जयेश हजारे, डॉ आर के डांगे, डॉ धनराज खानोरकर ,डॉ युवराज मेश्राम, धर्मपाल नागदेवते सदस्य ग्रा.पं सौ सुरेखा बगमारे ग्रा. पं सदस्या, डॉ प्रकाश वट्टी रासेयो, विभागिय समन्वयक, डॉ राजू आदे, डॉ के के गील प्रा अभिजित परकरवार व डॉ हेडगेवार रक्तपेढी चे प्रमुख प्रवीनजी करांकल हे उपस्थित होते. यावेळी प्रा. जयेश हजारे यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तसेच अवयव दान सुध्दा श्रेष्ठ दान आहे. आज भारतात लाखो लोकांना अवयवदानाची गरज आहे.यासंदर्भात समाजात जागृती निर्माण व्हावी व समाजात हा दुसऱ्याचे जीवन वाढविता यावे ही हा खरं कार्यक्रमाचे उद्देश दिसतो. जो पर्यंत असे कार्यक्रम आयोजीत करणार नाही तोपर्यंत समाजात जागृती निर्माण होणार नाही. आणि आज अवयवदान कार्यक्रमाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन प्रा जयेश हजारे यांनी केले. यावेळी 36 युनीट रक्तदान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ प्रकाश वट्टी रासेयो विभागिय समन्वयक तथा राष्ट्रीय छात्र सेना च्यावतीने घेण्यात आले. याप्रसंगी डॉ आर के डांगे, डॉ युवराज मेश्राम,डॉ सिध्दार्थ टेभुर्णे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार डॉ विवेक नागभिडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अभिमन्यू पवार,डॉ आशिष साखरकर, संजू मेश्राम,सचिन ठेंगरे, आदित्य राहुड, मयूर ठेंगरे राष्ट्रीय छात्र सेना कँडेस,व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली .




