Home बीड कांद्याला भाव नसल्याने बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कांद्याला भाव नसल्याने बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

130

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.8मार्च):- तालुक्यातील मौजे बोरखेड येथील संभाजी अर्जुन अष्टेकर वय २३ वर्षे याने कांद्याला भाव नाही म्हणून काल रात्री दि.०७ सोमवार रोजी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेला.परतलाच नाही सकाळी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला.

संपुर्ण कुटुंबातील कर्ताधर्ता एकट्यावरच जबाबदारी

संभाजी कुटुंबातील एकमेव कर्ताधर्ता असुन वयोवृद्ध वडील अर्जुन लक्ष्मण अष्टेकर वय ६५ वर्षे आई वनमाला वय ६० वर्षें,मोठा भाऊ शिवाजी वय ३० वर्षं परंतु भोळसर, मोठी बहीण सोनाली अंबादास वनकुदरे मुलगा मंदार वय ९ वर्षे भोळसर असुन,मुलगी ऋतुजा वय ७ वर्षे यांची जबाबदारी संभाजी यांच्यावर होती. ५एकर जमिनीत ३ एकर कांदा लावण्यात आला होता भाव नसल्यामुळे संभाजी चिंतेत असल्याचे त्याचे वडील अर्जुन अष्टेकर यांनी सांगितले, जवळपास साडे ३ लाख रूपये कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे जमादार सचिन डिडूळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.तलाठी बाळासाहेब वनवे आज दुपारी १ वाजता घरी भेट देऊन गेले.लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.दुपारी सव्वा ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण :- डॉ.गणेश ढवळे

नापिकी तसेच अतिवृष्टी आदी अस्मानी संकटांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच सुलतानी संकटाची त्यात भर पडली असून कांद्याला हमीभाव न देणे हे सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण होऊन बसले आहे.कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी दि.६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने केलेला खुनच आहे.व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here