सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड : – (दि. 24 मार्च)
तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षा पूर्वी जो समस्त मानवी कल्याणासाठी दुःखमुक्तीचा व माणसाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सांगितला तो मार्ग आजही मानवासाठी कल्याणकारी असल्याचे सर्वांनी या मार्गाचा अवलंब करावा असे प्रतिपादन भदंत आनंद बोधी यांनी केले.
ते आज विडूळ येथे आयोजित बौद्ध समाज अभिष्ट चिंतन महामेळाव्यात धम्मदेशना देताना बोलत होते.
सकाळच्या सत्रात भदंत महामोगलयान मुंबई यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात भदन्त किर्तीप्रियो नागसेन, मुंबई, भदन्त किर्तीबोधी, नागपूर येथून आलेल्या आर्या मिथीला यांची उपस्थीती होती.
पुढे बोलतांना मुख्य आयोजक भदन्त आनंद बोधी यांनी सविस्तर धम्मदेशनेतून, बुद्धाचा दुःख मुक्तीचा मार्ग सांगून बाबासाहेबांनी आम्हाला धम्मदेऊन आमचा उद्धार केल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित भिक्षू संघाने बुद्धाचा आदर्श जिवन जगण्याचा मार्ग सांगीतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देमाजी काळबांडे यांनी करून या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देत आजही जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व भूमीका मिलिंद धुळे यांनी मांडली या कार्यक्रमासाठी छायाताई धुळध्वज, नारायण भवरे, मधुकर काळबांडे, भास्कर धुळे, अजय धुळे, पांडूरंग धुळे, अशोक दवणे , विजय कानींदे सर कार्यकारणी मंडळाने सहकार्य केले.




