Home लेख मोठ्या साहित्यिक विचारवंत माणसापेक्षा मोठा माणूस!

मोठ्या साहित्यिक विचारवंत माणसापेक्षा मोठा माणूस!

219

 

मोठे मानस छोट्या माणसासाठी लिहत नाही. छोटे मानस मोठ्या माणसासाठी नेहमीच आदर्श ठेऊन लिहतात. म्हणूनच सागर तायडे साठी हे लिहतो. असंघटीत कष्टकरी नाका कामगार, मजूर, शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे. याचा सर्वच जागृत कार्यकर्ता, बुद्धीजीवी, साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.तो त्यांनी केला नसल्यामुळेच रिपब्लिकन पक्षाची विचारधारा किती ही चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठू शकला नाही. त्या रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिवस ३ ऑक्टोबर आहे. आणि असंघटीत कष्टकरी नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते सागर तायडे यांचा जन्म ही ३ ऑक्टोबरच आहे. त्यामुळेच ही दिनांक डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांशी खूप जुळणारी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गाडेगाव खुर्द, माध्यमिक शिक्षण सुनगांव, तालुका जळगाव, (जामोद) जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाले. पुढे त्यांनी मुंबई या ठिकाणी शिक्षण घेतले. असंघटीत कष्टकरी नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी सत्यशोधक बिगारी कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याचे काम त्यांनी सुरु केले. त्यांना लिहण्यासाठी प्रोत्साहन विजय सातपुते आणि शरद पाटील यांनी दिले, त्यामुळे त्यांनी अनेक समस्यावर लिहायला सुरुवात केली. ती आज ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यांचा पहिला लेख अब्राम्हणी सत्यशोधक मासिकाला पाठविला आणि त्यात तो छापुन देखील आला. तेव्हा त्यांना बरे वाटले. खर तर कोणत्याही नवीन लेखकाला आपला लेख छापुन आल्यावर अतिशय आनंद होतो. तसा सागर तायडे यांना पण झाला होता.
सागर तायडे हे टाटा पॉवर कंपनीत नोकरी करत होते. पण ते ग्रामीण भागातील आल्याने त्यांना असंघटीत कष्टकरी कामगारां बद्दल आस्था होती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चालत असलेल्या घडामोडींचा समस्याचा जवळून अभ्यास केला. आणि त्यावर लिहायला सुरवात केली. मग त्यांच्या लिखाणात गरिबांच्या व्यथा, सामाजिक प्रश्न, समस्या आणि राजकीय परिस्थिती या संदर्भात विश्लेषण करणारे लेख बातम्या प्रसिद्ध होत होत्या. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आरोग्याबाबत सातत्याने लिहायला सुरुवात केली ते सत्य परिस्थितीवर पोटतिडकीने लिहीत असल्याने आणि वास्तवदर्शी असल्याने त्यांचे लेख साप्ताहिक, दैनिक मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होत होते.आणि आज ही ४० पेक्षा जास्त वृत्तपत्रात त्यांचे लेख बातम्या प्रसिद्ध होत असतात.
कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडेचा जीवन संघर्ष त्यांच्या कौटुंबिक जीवन संघर्षा संदर्भात बाबत जर विचार केला. तर नक्की लक्षात येईल की त्यांची पत्नी ही चंद्रकला सागर तायडे ही अतिशय प्रेमळ असून, गरिबीची जाण असणारी आणि सुख दुःख समजून घेणारी होती. तिचा अलीकडेच २७ सप्टेंबर २०२३ रोजी ६० वा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा मुलगा प्रशांत सागर तायडे यांचा शून्यातून विश्व निर्माण करणारी मुलगी,पत्नी आणि आई,लेख मी वाचला त्यात ते आई आणि बाबा संदर्भात एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व असल्याचे सांगतात. बुद्धाने महिला मध्ये पाच गुण असले पाहिजे यांचे वर्णन सांगितले ते प्रशांतने माझी आई चंद्रकला सागर तायडे यांच्या असल्याचा उल्लेख केला आहे. ती प्रेमळ आहे,सुख दुःखात सहभागी होऊन पुढे चालणारी आहे. आपल्या कडील नातेवाईक असेल या तर पती कडील सर्वांना समान वागणूक देणारी आहे. त्यामुळे सागर तायडे हे आपल्या घरा बाबतीत निश्चित राहतात. ते सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. आता ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर ते स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ते स्तंभलेखक असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे चाळीस पेक्षा जास्त दैनिकात लेख नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लिखाण हे सामान्य लोकांच्या हितासाठी असते. म्हणून त्यांच्या लिखाणाला दैनिकात प्राधान्य दिले जाते. लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही.आपल्याला जी गोष्ट पटली त्याबद्ल लिहत राहावे त्याला प्रसिद्धी भेटेलच ही अपेक्षा करू नये असे मला सागर तायडे नेहमीच सांगतात. यामुळेच त्यांनी त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. 1) क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा 2) आरक्षण लाभार्थींनी शासनकर्ती जमात बनावे. आणि पुढील काळातपण त्यांची दोन तीन पुस्तके निघतील एवढे प्रचंड प्रमाणात त्यांचे लिखाण आहे. मी माझ्या अनेक समाज बांधवांना विकत घेऊन मोफत वाटली आहेत.
सागर तायडे यांचा वाढदिवस हा तीन ऑक्टोबर आहे. ६२ वर्षे पूर्ण होऊन ते ६३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांचा अनुभव खूप प्रेरणादायी आणि लक्षवेधी आहे.नियमितपणे विविध वृत्तपत्रात ते लिहतात आणि माझ्या सारख्याचे लेख नियमितपणे प्रसिद्ध करतात. त्यामुळेच त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना शिक्षकांना त्यांनी लेखक म्हणून ओळख निर्माण करून दिली त्यात मी एक ओबीसी सुतार समाजाचा एक सर्वसामान्य समाज बांधव प्रमोद सूर्यवंशी आहे. त्यांचे मित्र अविनाश टिपले पत्रकार चंद्रपूर यांनी सागर तायडे यांच्या वाढदिवसा निमित्याने लिहलेला लेख मी संग्रही करून ठेवला होता. त्याचा आधार घेऊन कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडेचा जीवन संघर्ष हा लेख तयार केला आहे. आणि सागर तायडे साहेबांचा जनसंपर्क मी मुंबई ते नागपूर, चंद्रपूर गडचिरोली गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पुणे नाशिक धुळे नंदुरबार येथील वाचक, पत्रकार आणि कार्यकर्त्याकडून स्वता अनुभवला आहे. कोणत्या तालुक्यात जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांच्याबाबत विचारले की ते त्यांच्या बद्दल खूप गौरवउद्गार काढतात. मार्शल सुतार या व्हॉटसअप ग्रुपवरील माझ्या समाज लिखाणाची खऱ्या अर्थाने बाग फुलविणारे आणि राज्यातील अनेक वृत्तपत्रात माझे लेख प्रसिद्ध होतात त्याबद्ल मी सागर तायडे साहेब आणि मालक, संपादक, संपादकीय मंडळाचे मी जाहीरपणे मनपूर्वक आभार मानतो. सोशल मिडिया वरील सुतार समाजाच्या अनेक ग्रुपवर माझ्या लिखाण बाबत सकारत्मक व नकारात्मक चर्चा होत असते. प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो प्रमोद सूर्यवंशी ला येवढी प्रसिद्धी कशी काय मिळते. त्यावेळी मी गर्वाने सांगतो. सागर तायडे सारखा वैचारिक मैत्री जपणारा माणूस मी आज पर्यंत पाहिला नाही. त्यांनी जे मैत्रीभावनेने नात जुळवीले ते जातीच्या व रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे ठरत आहे. त्यांचावर स्तुती सुमने वाहण्य येवढा मी मोठा साहित्यिक विचारवंत नाही.पण मोठ्या साहित्यिक विचारवंत माणसापेक्षा माझ्यासाठी सागर तायडे साहेब निच्छित मोठे वाटतात.माझ्या सारख्याचे लेख कॉम्पुटर वर काना मात्रा विलांटी, अनुस्वार सर्व चेक करण्यासाठी वेळ काढून कष्ट करणारे आणि सर्व पेपरला पाठविण्याची दक्षता घेणारे शोधून सापडणार नाही. म्हणूनच मी त्यांना यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने हे चार शब्द लिहले आहेत. माझ्या परिवार कडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी मंगल कामना करतो.

 

प्रमोद सूर्यवंशी,चिखली मातृतीर्थ बुलढाणा,मो.८६०५५६९५२१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here