Home महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनसंवादाची गरज

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनसंवादाची गरज

92

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29ऑगस्ट):-गंगाखेड येथील दिनांक २९आगस्ट 23 रोजी संत जनाबाई महाविद्यालय येथे जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद यात्रा आली आसता राज्यकार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार यांनी जादूटोणा विरोधी कायद्याबाबत विविध प्रात्येक्षितासह संवाद साधताना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनसंवादाची गरज आहे असे प्रतिपादन केले.

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त व कायद्याला १०वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन जनसंवाद साधत आहे.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य दयानंद उजळंबेयांच्या उपस्थितीत जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद यात्रा घेण्यात आली. या कार्यक्रमात नंदिनी जाधव, भगवान रणदिवे,मुंजाजी कांबळे यांनी संवाद साधला.

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत असणारी १२अनुसूची,गुन्ह्याचे स्वरूप व शिक्षेची तरतूद याबाबत माहिती दिली. जादूटोणा विरोधी कायद्याच्या चित्रमय पोस्टरद्वारे कायद्याबाबत माहिती दिली.जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने जादूटोणा विरोधी कायदा राज्यभर पोहचवणे व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत असा संदेश या यात्रेच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार आभार डॉ सचीन खोकले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ किर्तीकुमार मोरे, प्रकाश शिंगाडे,राहुल साबणे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here