Home महाराष्ट्र समाजाने जातीचा खोटा अहंकार टाकल्याशिवाय प्रगती नाही-प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड

समाजाने जातीचा खोटा अहंकार टाकल्याशिवाय प्रगती नाही-प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड

158

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.26ऑगस्ट):- येथे दिनांक 26 आगस्ट 2023रोजी द्वारका function hall फंक्शन हॉल येथे साहित्य रत्न, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती निमित्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड बोलत होते. त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की व्यवस्थेने दिलेल्या खोट्या जातीच्या अहंकाराला अलंकारासारखे जपणे हिच लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे कोणी आपल्या नावापुढे डॉक्टर प्राध्यापक वकील सायंटिस्ट अशा पदव्या लावत असेल तर त्या पदव्या त्या व्यक्तीने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या बुद्धिमत्तेतून व कर्तुत्वाने मिळवलेले असतात.

त्यामुळे त्या पदव्यांचा मोल समाजात मोठा असतं पण आजकाल जातीचा उल्लेख जाणून-बुजून केल्या जातो जे आम्हाला परंपरेने व्यवस्थेने गुलाम म्हणून आमची ओळख त्या जातीतून दिसून येते ती ओळख पुसण्यासाठी आजचा तरुण प्रयत्न करताना दिसून येत नाही ही शोकांतिका आहे एखाद्या व्यवस्थेतील जात ही मिरवण्यासारखी गोष्ट नाही याचे भानही समाजाला येणे गरजेचे आहे त्यामुळे आपण आपल्या समाजापुढे काय आदर्श ठेवतो काय विचार ठेवतो यावर त्या समाजातील लोकांचे भविष्य असते गावातला माणूस शहरातल्या आपल्या बांधवाकडे बघून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा विचार करत असतो जर शहरातल्या शहाण्यांनीच मूर्खपणा केला तर गावाकडचा माझा माणूस जो भोळा भाबडा आहे तो शिकलेल्या माणसाच्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो

त्यामुळे गावातल्या भोळ्या भाबड्या माणसाची फसवणूक होणार नाही याची जबाबदारी समाजातल्या शिकलेल्या वर्गाची आहे असे म्हणत त्यांनी या समाजाला एक झेंडा नाही एक नेता नाही ही खंत ही व्यक्त करत कदाचित मातंग समाजाचा नेता महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर होईल असे म्हणत इथल्या राजकीय व्यवस्थेवर ही भाष्य करताना त्यांनी सांगितले नेता कोणाला म्हणावे हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा इथल्या राजकीय व्यवस्थेने या समाजाला ठेवलेला नाही त्यामुळे हा आमचा नेता नाही असे म्हणण्याची धमक आणि शहाणपणा जोपर्यंत या समाजात येणार नाही तोपर्यंत या समाजाला फुले शाहू आण्णाभाऊ यांचा विचार घेऊन जाणारा नेता मिळणार नाही तेव्हा समाजाने व्यवस्थेला विरोध करण्याची धमक येणाऱ्या काळात ठेवावी लागेल तरच प्रगती आणि हा समाज दखलपात्र होईल असे सांगितले यावेळी विचार पिठावर डॉक्टर किशन गारोळे, एम. बी. गोटमुकले, बी.यु. ग्वाले , डि. जी. वाळवंटे, पपुराज शेळके, गौतम रोहीनीकर, नगरसेवक चंद्रकांत खंदारे मुंजाजी कांबळे,आदि मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोहीदास लांडगे व अनिल साळवे यांनी केले तर आभार पत्रकार राहुल साबने यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी कांबळे (पत्रकार) यांनी केले यावेळी गुणवंत कांबळे, भीमराव कांबळे, आनंद शिंदे,भागवत जलाले, देवानंद गुंडाळे,शेख महेमुद, अतिश खंदारे, सूर्यमाला मोतीपवळे अँड.विलास लांडगे हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे संयोजक अनिल साळवे (पत्रकार)व रोहिदास लांडगे (महाराष्ट्र जन क्रांती सेना ) यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here