रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 22 मार्च):- अल्कोहोलिक्स अँनानिमस माणूस इतका दारू का पितो? प्रवाहा समूह किन्ही व आंतर समूह गडचिरोली ग्रामीण तसेच कल्याण समूह रुई यांच्यावतीने हनुमान मंदिर रुई च्या पटांगणावर मध्यपास हा जीव घेणारा आजार या विषयावर जनजागरण सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोकुळदास बालपांडे साहेब रुई तर प्रमुख अतिथी गोवर्धन दोनाडकर पत्रकार देशोन्नती तथा सचिव तालुका पत्रकार संघ ब्रह्मपुरी, संदीपभाऊ बगमारे अध्यक्ष तंटामुक्ती समिती रुई ,प्रधान बाबुसाहेब रुई ,सुनील राऊत चेअरमन व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मध्याशक्ती ही आरोग्याची मोठी समस्या म्हणून ओळखली जाते. अमेरिकेत हदयरोग व कॅन्सर यानंतरचा तिसरा घातक आजार तोच आहे आणि तो केवळ मध्याशक्तीचा घात करतो असे नसून घरोघरी कार्यालयामध्ये व महामार्गावर त्यांचा परिणाम होऊन इतरांना दुखापत पोहोचवतो समाजाला दरवर्षी करोडो रुपयाची किंमत मध्या सक्तीपोटी मोजावी लागते असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी डॉ. गोकुळदास बालपांडे यांनी मांडले .
जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा विचार करूनच पुढील पावले उचलावे जीवनात एखादा पाऊल चुकला तर जीवनाची वाट लागू शकतो. दारू पिल्याने कोणाचेही भले झाले नाही तर जीवन उध्वस्त झाले आहेत. असे अनेक उदाहरण देऊन गोवर्धन दोनाडकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रवाह समूह किन्ही व आंतर समूह गडचिरोली तसेच कल्याण समूह रुई येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.




