बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.21मार्च):-गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच बीड जिल्ह्यातील केजमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. चौधरी कुटुंबीयाताली तीन चुलत भावंडं एका पाण्याच्या खड्यात अंघोळीसाठी उतरली होती. मात्र ही तीनही लहान असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे अंघोळसाठी मुलं उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने अल्पवयीन तीनही भावंडं त्या पाण्याच्या खड्यात बुडाली. केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील तीन अल्पवयीन चुलत भाऊ एकाच वेली शेतातील पाण्याच्या खड्ड्यात बुडल्याने शोककळा पसरली आहे.
केज तालुक्यातील आणि केजपासून 15 किलोमीटरवर असलेल्या पैठण (सावळेश्वर) येथे स्वराज जयराम चौधरी (वय 7 ), पार्थ श्रीराम चौधरी (वय 8), श्लोक गणेश चौधरी ही तीन चुलत भाऊ गणेश चौधरी वय (वय 7) यांच्या शेतातील बोअर शेजारी असलेल्या पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी त्या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या तीनही भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.




