सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.9फेब्रुवारी):-भगवतीदेवी विद्यालय, देवसरी येथे निसर्गरम्य अशोक वृक्षाच्या छायेखाली *हृदयरोगावर आपण मात करू* या विषयावर डॉ. एस पी गोरे यांनी व डॉ. बट्टेवार यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले हा कार्यक्रम सकाळी परिपाठ झाल्यावर साडेअकरा वाजता सुरू झाला. प्रथम मान्यवरांचे विद्यालयात स्वागत केले. लगेच मार्गदर्शन करायला सुरुवात झाली. तर हा 29 सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन आहे प्रत्येकाचे हृदय प्रत्येकाच्या हाताच्या मुठीएवढी असते. आपल्या मेंदूला सुद्धा रक्त पोहोचण्याची काम करते. त्यासाठी शरीराला अन्न पाणी हवा ऑक्सिजन आवश्यक आहे.
तीन ते पाच मिनिट जरी रक्तपुरवठा बंद झाला. तर मानवाचा मृत्यू होतो. शरीरास ऊर्जा साठवता येत नाही. हृदय प्रत्येकाला एकच असते. डोळे कान नाक हात पाय हे दोन अवयव असतात शरीरात दहा हजार अब्ज पेशी असतात. हसणे बोलणे चालणे खेळणे विचार करणे हे उर्जेवर अवलंबून असते. रक्तपुरवठा नाही झाला तर अवयव निकामी होतात. आपली जीवनशैली खानपान आहारावर अवलंबून असते.
अंड्यापेक्षा प्रोटीन द्विदल धान्यातून मिळतात ज्वारी गहू बाजरी यामधून कर्बोदक मिळतात गरजेपेक्षा जास्त खाऊन काहीच फायदा नाही. ऋतुमानानुसार फळे खावी प्रत्येकाचा संतुलित आहार असावा तूप तळलेली पदार्थ खाऊ नये. असे मार्गदर्शन त्यांनी केले.तर डॉ. बट्टेवार साहेबांनी हार्टअटॅक आल्यावर काय उपचार करावे यावर त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले एखाद्या व्यक्तीला चक्कर अपघात शास्वोस्वास बंद पडला तर सीपीआर पद्धतीने आपणास काही वेळात बंद पडलेले ह्रदय चालू करता येते.
याचे पेशंटच्या छातीवर तीस वेळा पंपिंग करावी आपल्या तोंडाने पेशंटच्या तोंडात हवा फुकावे व अशा प्रकारे हृदयावर मात करण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले तर कुमारी सानिका विनायक शिंदे व अभय वानखेडे यांनी आदित्य कदम यांच्यावर उपचार करून प्रात्यक्षिक करून दाखविले. अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम विद्यालयात पार पडला डॉ. साहेब स्वतःचा व्यवसाय बंद करून समाजसेवा करण्याचा जणू काही त्यांनी वसाच घेतला कोणत्याही प्रकारची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नाही. विद्यालयाने शाल दिलेली त्यांनी परत विद्यालयात दिली या कार्यक्रमाचे संचालन दिगंबर माने सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी केले या कार्यक्रमास शेख सत्तार गणेश शिंदे राजेश सुरवसे अनिल अल्लडवार भागवत सौ. मीनाताई कदम पांडुरंग शिरफुले अरविंद चेपुरवार भागवत जाधव यांची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून कार्यक्रम ऐकला त्याबद्दल डॉ. गोरे साहेबांनी सर्वांचे आभार मानले.




