वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वर्धा(दि.20जानेवारी):-युवकांना विशिष्ट दिशा देणारे स्वामी विवेकानंद जनु ज्ञान विद्यापीठ तर सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना सामावून आपले स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी राजेवर बालमनापासून सर्वधर्म सम भावाचे बाळकडू पाजणाऱ्या राजमाता जिजाऊ जणू एक प्रकारचे संस्कार विद्यापीठच होत्या असे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ महादेव चुंचे यांनी केले
कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथे राष्ट्रीय सेवा योजना व सास्कृतिक सामितीच्या संयुक्त विद्यामाने महाविद्यालया मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर होते. कार्यक्रमाचे प्रमूख पाहूने डॉ.महादेव चुंचे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन जाधव, विशेष उपस्थिती ग्रंथालय सहायक स्मिता चन्ने विचारमंचावर उपस्थित होते.
डॉ.महादेव चुंचे पुढे बोलताना म्हणाले की , स्वामी विवेकानंद बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता. शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळख होते. तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि अध्यात्मिक प्रवास सुरू केला तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने! स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहेत.
तसेच राजमाता जिजाऊ यांनी कर्तव्य व व्यवहाराची सांगड घालून विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या जिजाबाई म्हणजे एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच असते आणि ते पारतंत्र्यात असणाऱ्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. तिचेच गुण शिवरायांमध्ये दिसत होते. आईचा स्वाभिमान, वडिलांचा पराक्रम आणि सभोवतीची परिस्थिती याची जाणीव शिवबांच्या ठायी एकवटली होती. राजकारण, समाजकारण यातून लोकांचे हित पाहणाऱ्या जिजाबाईंवर कौटुंबिक आपत्तींचे आघात होतच होते; पण विचलित न होता त्यांनी आपले कार्य शांतचित्ताने सुरू ठेवले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंदू पोपटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकून, महापुरूषांचे विचार अत्मसात करण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. अशोक सातपुते यांनी केले. तसेच संचालन प्राप्ती कांबडी यांनी केले तर अभार प्रा. गजानन जाधव यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.




