बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.6ऑगस्ट):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुकाशाखा पुसद यांच्या वतीने पारमिता बुद्धविहार महावीरनगर येथे चिंतन शिबिर दि.६ ऑगस्ट२०२३रोजी घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक भारत कांबळे ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.खुशाल ढवळे जिल्हा शाखा सचिव प्रचार व पर्यटन विभाग , तर उद्घाटक म्हणून सुनिता वाळके, प्रमुख उपस्थिती म्हणून बौध्दाचार्य भगवान बरडे हे उपस्थित होते.
यावेळी चिंतन शिबिरामध्ये प्रबोधनकाराची आचारसंहिता,धम्म चळवळ गतिमान करणे,भारतीय बौध्द महासभेचे मिशन,शाखेचा लेखाजोखा या तीन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी समता सैनिक दलाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलानाथ कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन ल.पु.कांबळे यांनी केले आणि आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले.यावेळी भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी मंडळी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




