सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड )मो:-9075686100
म्हसवड(दि.6ऑगस्ट):- अग्रणी सोशल फौंडेशनच्या कार्यक्षेत्रातील २५ एकल महिला उद्योजिका घडविण्याचे लक्ष्य सर्व संचालिका व पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे.नारीशक्ती प्रकल्पाची सुरुवात आज विटा,लेंगरे ता.खानापूर व नेवरी ता.कडेगाव येथून करण्यात आली.यावेळी साधन व्यक्ती व मार्गदर्शक म्हणून मुनीर शिकलगार हे होते.याची सर्व अभियानासाठी संचालिका शोभाताई लोंढे, सुहासिनी शिंदे, करीना मुल्ला व पाकिजा शिकलगार यांनी योगदान दिले आहे.
अग्रणी सोशल फौंडेशन,विटा ही संस्था सांगली जिल्ह्यात वंचित, उपेक्षित, दुर्बल घटकामध्ये आर्थिक साक्षरता, उपजिवीका व कौशल्य विकास या विषयावर काम करत आहे.त्याअनुषंगाने खानापूर व कडेगाव तालुक्यातील एकल महिलांमध्ये उद्योजकीय मानसिकता तयार करण्यासाठी नारीशक्ती अभियान राबविण्यात सुरूवात झाली आहे.यामध्ये दर महिन्याला कार्यक्षेत्रात दोन ठिकाणी वंचित समुहातील एकल महिलांना व्यवसाय व उद्योगासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यासाठी तांत्रिक मार्गदर्शन अग्रणी संस्थेचे सहकार्य मिळत आहे.यामध्ये एकल महिलांना उद्योग निवड, आवश्यक कागदपत्रे, विविध योजना, शासकीय अर्थसहाय्य, तांत्रिक माहिती व आर्थिक साक्षरता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या नारीशक्ती अभियानाची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापिका शोभाताई लोंढे यांचेकडे असून सुहासिनी शिंदे,करीना मुल्ला व पाकिजा शिकलगार या प्रकल्प संचालिका म्हणून कार्यरत आहेत.
यामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान पाच एकल महिला उद्योजिकांना सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी व्यवसाय करण्यास इच्छुक महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले.तसेच अग्रणी सोशल फौंडेशनच्या या संस्थेस सहकार्य व मार्गदर्शनासाठी पत्र देण्यात आले. या नारीशक्ती अभियानास शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास सगरे,रिपाइं नेते दादासाहेब चंदनशिवे,कॉग्रेस नेते अल्लाबक्ष मुल्ला, सचिन लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.तर यावेळी जयमाला चव्हाण,मनिषा चव्हाण,फरिदा मणेर, यास्मिन काझी,विद्या घाडगे,पूनम चंदनशिवे, लक्ष्मी बुधावले,सारिका बुधावले,तब्बसूम मुल्ला,सुरैय्या मुल्ला,विद्या सुर्यवंशी या कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.




