प्रतिनिधी(अनिल साळवे)
येथील नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ शहर सुंदर शहर अभियान मोठा गाजावाजा करत नुसतेच कागदोपत्री गाजवल्याचे उघडकीस आले आहे. आज घडीला गंगाखेड शहरात अनेक ठिकाणी घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे घाणीमुळे मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडेही पाऊस झाले की नाल्या तुंबत आहेत असाच प्रकार जुन्या शहरातील हटकर गल्लीत घडला असून बुधवार रात्री पाऊस पडल्याने नाल्या तुंबल्याने घरासमोर घाण पाणी साचले यामुळे येथील नागरिकांना लहान मुलांना येथून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.नालीचे घाण पाणी घरासमोर साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गंगाखेड नगर परिषदेच्या वतीने मोठा गाजावाजा करत स्वच्छता अभियान फक्त कागदोपत्री राबऊन लाखो रुपयांचे बिले नगरपालिका प्रशासन उचलत आहे असा गंभीर आरोप नागरिकांतून केल्या जात आहे गंगाखेड शहरात बाजारपेठ सहित सर्वच गल्लीबोळांमध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचल्याचे दिसत आहे गंगाखेड नगर परिषदेवर प्रशासक असल्यामुळे राजा बोले दल हले असाच काहीसा प्रकार पाहावयास मिळत असल्याने गंगाखेड शहराला कोणी वालीच राहिला नसल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
सध्या पावसाला सुरू असून लहान मुलांच्या शाळाही सुरू झाल्या आहेत त्यामुळे गंगाखेड शहरातील बाजारपेठ व सर्वच गल्ली कॉलनीमधील घाण कचरा, नाल्यांची साफसफाई करून स्वच्छता करावी जेणे करून नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येणार नाही अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे वेळ पडली तर आंदोलन ही करावे लागेल असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे




