चंद्रपूर/
सा-या झाडीपट्टयाचे लोकजीवन प्रा खानोरकरांनी ‘ संजोरी’त मांडले आहे.हे त्यांनी एक पुस्तकरुपाने दस्तऐवज म्हणून आपल्या सामोर आणलं आहे.झाडीच्या लोककलांबद्दलचा असा पुस्तक पहिल्यांदाच आला.ते यमक,श्लेष वापरतात व स्वत:च नव्या म्हणींना जन्म देतात.हे प्रा.खानोरकरांचे काम बहुमूल्य असे असून तो काही प्राध्यापकांचा संशोधन पेपर नव्हे तर झाडीसंचिताचा ललितबंध आहे ” असे मार्मिक विचार ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटेंनी केले.
ते डॉ.धनराज खानोरकर लिखित झाडी लोककला, लोकसंस्कृतीच्या ‘संजोरी’ ग्रंथ प्रकाशनानिमित्त श्रमिक पत्रकार संघ भवनात बोलत होते.’संजोरी’चे प्रकाशन प्रा.सुरेश द्वादशीवारांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाने आयोजित केला होता. विचारपिठावर डॉ.श्याम मोहरकर,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व लेखक डॉ.धनराज खानोरकर,कवी अरुण झगडकर उपस्थित होते. यावेळी प्रा.द्वादशीवार म्हणाले की,मी नंदुरबार पासून देश, विदेशातील गडचिरोलीच्या सिरोंच्यापर्यंतचे आदिवासी पाहिले.ते गरिब,दरिद्री, कष्टकरी आहेत पण ते दुःखी, खिन्न,निराश नाहित.त्यांच्या पोरांच्या तोंडावर माशा बसतात पण ते हसतात. चांगले लेख प्रा.खानोरकरांनी ‘ संजोरी’त लिहलेत अन् ते खास विनोदी शैलीत.’संजोरी ‘ म्हणजे धानचुरन्याचे खळयावरील शेवटच्या मोळयाचे मटनाचे जेवन.या देशातले ८४ टक्के हिंदू मांसाहारी आहेत.’ संजोरी ‘ याही दृष्टीने महत्त्वाची आहे.जे इतिहास विसरतात त्याला भविष्य असत नाही.ग्रामीण, आदिवासी,झाडीपट्टीचे सौंदर्य ‘ संजोरी ‘त आहे.येथील ‘ झाडी माणसाची ‘मोह’माया ‘हा अत्यंत सुंदर लेख.कधीतरी संचिताकडे आपण लक्ष दिले पाहिजे,ते यांनी दिले.तिखट ही चव आहे.हिरोती हा त्याचा खरा शब्द आहे.संवाद हे साध्य आहे,भाषा माध्यम आहे,म्हणून संवाद व्हावा. ‘ संजोरी ‘पुस्तकात राहू नये ती लोकांच्या मनात जावे,असे बहूमूल्य विवेचन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकरांनी झाडीबोलीचा इतिहास कथन केला. डाॅ.खानोरकरांनी ‘ संजोरी ‘ जन्माची कथा सांगीतली. संचालन चंद्रपूर झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकरांनी तर आभार कवी प्रशांत भंडारेंनी मानले. कार्यक्रमाला अनेक कवी, लेखक,विचारवंत श्रोते उपस्थित होते.काही मान्यवरांनी डॉ खानोरकरांचा याप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.




