Home महाराष्ट्र जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अस्मिता भवन...

जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अस्मिता भवन येथे संपन्न

65

 

मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक ७ जून २००५ रोजी सायंकाळी जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून जोगेश्वरी भूषण डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, उच्च न्यायालयाचे वकील जगदीश जायले, समुपदेशक व मार्गदर्शक ऍड रूषीला रिबेलो, जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत, कुर्ला भूषण सत्येंद्र सामंत, डॉ महेश अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वळंजू हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी द्वीप प्रज्वलक करून तसेच योगिता हिरवे यांच्या स्वागत गीताने आणि भूषण मुळे यांच्या शिव गर्जनेने करण्यात आली. प्रास्ताविक जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले तर सूत्रसंचालन नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील आणि कार्यधाक्षा असूंता डिसोझा यांनी केले. यावेळी जॉयच्या सामाजिक कार्याचा मागोवा घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशनदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जॉय संस्थेच्या वतीने अस्मिता शाळेचे संस्थापक दादा पटवर्धन, शिक्षक नेते जनार्दन जंगले आणि जेष्ठ वृत्तपत्रलेखक विश्वनाथ पंडित यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जॉयच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाज विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या जवळपास दीडशे व्यक्ती संस्थांना आदर्श समाजसेवक, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, आदर्श संपादक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शाळा, आदर्श माता, आदर्श गृहिणी, आदर्श दिवाळी अंक, आदर्श तिकीट निरीक्षक, आदर्श शाखाप्रमुख इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्वच मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी जॉय सामाजिक संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुक करत प्रामाणिक व शुद्ध हेतूने समाजातील वंचित, गरीब व गरजू घटकांना सभासदांच्या वर्गणीद्वारे आवश्यक सहकार्य करणाऱ्या जॉय सारख्या संस्थांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. जवळपास दोन तास चाललेला हा जॉय चा हा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉयचे पदाधिकारी व सभासद असूंता डिसोझा, वैभव पाटील, भूषण मुळे, चंद्रशेखर सावंत, शीला येरागी, छाया राणे, श्रद्धा कारके, योगिता हिरवे, मीना भूतकर, दत्ता रातवडकर, रोशनी ठोकळे, सृष्टी मुळे, विजय फणसेकर यांनी अथक परिश्रम घेतले. हा नयनरम्य सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर, जॉयचे पदाधिकारी, सभासद, देणगीदार, उपस्थित पुरस्कार्थी आणि पत्रकार बांधवांचे जॉयचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here