चोपडा- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मासीक मिटिंग आयोजित करण्यात आली, या मिटिंग चे बैठकिचे अध्यक्षस्थानी अशासकीय सदस्य:- प्रा. उदयकुमार शरदचंद्र अग्निहोत्री सर होते जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले ठरावांना एक मताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यात आली.धाराशिव जिल्ह्यात जुलै महिन्यात राज्यस्तरीय राज्य सभा आहे त्यावेळी जळगांव जिल्ह्यातून प्रत्येक सभासदांना तिथे येण्याचे करावे त्यासाठी रेल्वे किंवा बसची सोय करावी लागेल त्याचा आढावा घेऊन नियोजन करावे. त्यात महत्वाचा विषय असा की, सदरहु काही सभासद आपण आग्रहाने त्यांना मान देऊन मिटिंग ला या असा अजेंडा पाठवतो परंतु तरी देखील ते येत नसतील तर आपण रितसर जो सभासद काहीतरी कारण सांगुन मुद्दामहून येत नसतील किंवा वषॅ भरातुन लगोपाठ तिन मिटिंगला येत नसतील त्याचे सभासद पद रद्द करण्यात येईल. असे ठरावात मंजुरी देण्यात आली आहे. आपले पद हे कामासाठी दिलेले आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारीने व्यवस्थित कार्य पार पाडावे हि आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष:- राजेशभाई गुजराथी, सचिव:-भुपेंद्रभाई गुजराथी, संघटक:-अनिल बारी सर, प्रबोधन मंत्री:- भालचंद्र साळुंखे सर, प्रसिद्धी प्रमुख:- डाॅ पृथ्वीराज सैंदाणे,पोतदार साहेब, उपस्थित होते. त्यावेळी भालचंद्र साळुंखे सर यांनी आभार व्यक्त केले.




