मुंबई(प्रतिनिधी /दत्ता खंदारे )समस्त कक्कय्या समाज महासंघ यांच्या २०२५ या रौप्य महोत्सवी वर्षाचे मंगलमय औचित्य साधून कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आणि सामाजिक मंडळाच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.सदर चर्चा सत्राचे आयोजन ८जून २०२५रोजी मुंबईत करण्यात आले आहे.
यावेळी ढोर व कक्कया समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या संघटना / मंडळे / संस्था / फाऊंडेशन इत्यादींच्या पदाधिका-यांना उपस्थित राहून चर्चा सत्रात भाग घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता राजर्षि शाहू महाराज सभागृह, ३रा मजला, (छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहाच्या) न. चि. केळकर रोड, दादर (प), मुंबई-४०००२८, येथे करण्यात आले आहे.
या चर्चा सत्रात पुढील विषयावर विचार मंथन करुन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
१) २०२५ या मंगलमय रौप्य महोत्सवी वर्षाचा भव्य दिव्य सोहळा साजरा
करणे.
२) २०२५ ची मंगलमय रौप्य महोत्सवी “स्मरणिका ” काढणे.
३) २०२५ या मंगलमय रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र, गुजराथ इ. राज्य व देश पातळी वरील कक्कय्या ढोर समाजाचे मुंबई येथे ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०२५ मध्ये भव्य दिव्य अधिवेशन घेणे.
४) संत शिरोमणी विरशैव कक्कया महाराजांचा पुर्णाकृती पुतळयासह भव्य स्मारक मुंबई येथे बांधून देणे.
५) तत्कालीन मा. मुख्यमंत्री, श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ या समाजासाठी देऊ अशी अधिवेशनात घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी शासन निर्णय पारित करून अद्याप झालेली नाही. ती त्वरीत करण्यात यावी.
६) ढोर कक्कय्या समाजातील थोर स्वातंत्र सेनाने, हरियाणा व उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल आणि मुंबई प्रांताचे मंत्री स्वर्गीय गणपतरावजी देवजी तपासे साहेब यांचे देशासाठी मौलीक योगदान असल्याने त्यांचे स्मारक शासनातर्फे उभारण्यात यावे.
७) देशाच्या पहिल्या हंगामी लोकसभेचे खासदार आणि नंतर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले तसेच आमदार कै. मा. श्री. तायप्पा हरि सोनावणे हे ढोर कक्कय्या समाजाचे प्रतिनिधी होते. व त्यांनी युनो मध्ये शासनाचे प्रि केले होते. अशा लोक नेत्याचे स्मारक शासनातर्फे उभारण्यात यावे.
८)माजी आमदार, लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, साहित्यीक, चित्रपट कलाकार तसेच दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आलेले स्वातंत्र सैनिक, समाज सुधारक, स्वर्गीय नामदेवरावजी व्हटकर.
कै. नामदेवरावजी व्हटकर हे ढोर कक्कय्या समाजाचे लोकप्रिय नेते असून सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचे संपूर्ण चित्रीकरण त्यावेळचा अतिशय विपरित काळामध्ये केले. यासाठी पैसा अडका नसल्याने स्वत:चा प्रिन्टींग प्रेस गहाण ठेऊन कर्ज काढले व असे महान कार्य केले.
९) कै. मा. आमदार गणपतराव सोनवणे हे सलग सन १९५२ ते १९६७ असे ३ वेळेस आमदार होते.त्यांचे कार्य समाजासाठी मौल्यवान होते. या सर्वांचे स्मारक उभारून नव्या पिढीला याची जाणीव करुन देण्यासाठी, समाज पुन्हा एकत्रित आणण्यासाठी,
आदी विषयावर चर्चा आणि विचार मंथन होणार असून यासाठी संत कक्कय्या समाजातील बांधवानी मोठया संख्यने उपस्थित राहून यात आपला सहभाग नोंदवावा असे समस्त कक्कय्या महासंघ यांच्या वतीने अध्यक्ष श्री निवृत्ती सावळकर, कार्याध्यक्ष श्री मारुती सदाफुले,
सरचिटणीस श्री प्रकाश दरवेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




