Home महाराष्ट्र अग्रणी संस्थेच्या वतीने महिला संविधान परिषद संपन्न

अग्रणी संस्थेच्या वतीने महिला संविधान परिषद संपन्न

166

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड /सातारा : अग्रणी सोशल फौंडेशन, या संस्थेच्या वतीने विटा येथे मोठ्या उत्साहात महिला संविधान परिषद संपन्न झाली.ही परिषद क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या परिषदेचे उद्घाटन सक्षमा फौंडेशनच्या अध्यक्ष पुजाताई विशाल पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुजाता म्हेत्रे मॅडम होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्रणी सोशल फौंडेशनच्या संचालिका सविता काकडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कर्तृत्ववान आदर्श महिलांचे तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाकिरा मुल्ला यांनी स्वागत केले. नंदाताई खैरमाडे यांनी संविधान गीत सादर केले. संविधान उद्देशिका वाचन सुनीताताई कांबळे यांनी तर शोभाताई लोंढे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख व सन्मान संस्थेच्या संचालिका अनुराधा ठोंबरे, सुनीता कांबळे, सुनीता पवार, शैलजा भिंगारदिवे आणि सलीमा शेख यांनी केला. अग्रणी संस्थेच्या सुहासिनी शिंदे आणि शुभांगी पवार यांचा कोरो संस्थेची ग्रासरूट फेलोशिप समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फेलोनी भटकेविमुक्त समूहासोबत शिक्षण,आरोग्य,रोजगार, निवारा,अधिकार,हक्क, नागरिकत्व, दाखले व संविधान प्रचार हे मुद्दे घेऊन काम करत असतानाचे आपले अनुभव व्यक्त केले. फेलोंचा कार्यअहवाल व अग्रणीच्या रणरागिणी या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कोरो संस्थेची ग्रासरूट फेलोशिप समारोप निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पूजाताई पाटील (अध्यक्षा-सक्षमा फाउंडेशन) महिलांचे सक्षमीकरण रोजगार तसेच सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महिलांचे नेतृत्व यावर मार्गदर्शन केले. मा. नगरसेविका ज्योतीताई आदाटे यांनी संविधान मूल्य व अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शाहीन मुल्ला (जिल्हाध्यक्ष ओबीसी संघटना) संविधान भारताचा धर्मग्रंथ कसा आहे हे आपल्या व्याख्यानातून महिलांना पटवून दिले. अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले मॅडम यांनी सांगितले की समाजात परिवर्तन चळवळींत अग्रेसर महिलांची संख्या खूप कमी आहे. स्वतःची ओळख,धाडस, बोलण्याची कला, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक भाव आणि भान हे गुण येण्यासाठी महिलांनी सामाजिक संस्थेसोबत जोडून घ्यावे. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा एक सामाजिक आजार आहे. अशा प्रकारे महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा‌.सुजाताताई म्हेत्रे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात अग्रणीच्या रणरागिणींच्या कार्याचे कौतुक केले. महिलां संबंधित कायदे आणि संविधानाने दिलेली स्त्री पुरुष समानता तसेच अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये आलेले अनुभव याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालिका सुनीताताई कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अग्रणी सोशल फौंडेशनच्या शोभाताई लोंढे, नंदाताई खैरमाडे, मंदाताई सोनताटे, सविता काकडे, सुनिता कांबळे, सुनीता पवार, अनुराधा ठोंबरे, शैलजा भिंगारदिवे, शाकीरा मुल्ला, सुहासिनी शिंदे, गणेश धेंडे, हजरतअली सोनीकर, सागर माने, मंगल भादुले , शुभांगी पवार यांनी परिश्रम घेतले. या परिषदेसाठी आटपाडी, खानापूर जत तासगाव कडेगाव, पलूस इत्यादी तालुक्यातील महिला सहभागी होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here