Home पुणे शेतकऱ्यांची औलाद कशी ओळखावी?

शेतकऱ्यांची औलाद कशी ओळखावी?

128

एकदा एक शेतकरी मेला. त्याला तीन मुले होती. मरतांना त्याने भाऊबंद ला सांगितले कि माझी जमीन, घरदार फक्त दोन मुलांना द्यावी. कोणाला देऊ नये,हे मात्र सांगितले नाही.

  भाऊबंदमधील जेष्ठ मंडळींना हे कोडे सुटेना. त्यांनी शीख धर्मगुरूंच्या ग्रथांचा अभ्यास केला. त्यात असे उदाहरण घडले होते. त्या धर्मगुरू ने त्याचा उलगडा केला होता. म्हणून ती युक्ती वापरली.

  ज्येष्ठांनी त्या शेतकरीचा पुतळा पिठाचा बनवला. हुबेहुब तसाच. जसे आपण मातीचा गणपती बनवतो. तिनही मुलांना बोलवले. म्हणाले, तुमच्या बापाचा हा पुतळा आहे. जो कोणी याला लाथ मारील त्याला संपत्तीचा हिस्सा मिळेल. तसा तुमच्या बापाचा संदेश आहे.

   मोठा मुलगा आला. त्याला सांगितले. मार लाथ. लाथ मारली तरच तुला हिस्सा मिळेल. असा तुझ्या बापाचा आदेश आहे.

   तो मागे सरकला. मी नाही मारणार माझ्या बापाला लाथ.

   अरे! हा तर फक्त पुतळा आहे. खरोखरचा बाप नाही.

  तरीपण त्या मुलाने सांगितले, मला संपत्तीत हिस्सा नाही दिला तरी चालेल. पण मी लाथ मारणार नाही. मला नको अशा मार्गाने संपत्ती.

  दुसऱ्या मुलाला बोलवले. म्हणाले, याला लाथ मार. तुला संपत्ती मधे हिस्सा देऊ. तसा तुझ्या बापाचा आदेश आहे.

तो म्हणाला, माझा बाप? आणि मी संपत्ती साठी लाथ मारू? मुळीच नाही. मला संपत्ती मधे हिस्सा नाही दिला तरी चालेल. पण बापाला लाथ मारणार नाही. मला नको अशा मार्गाने संपत्ती.

   तिसऱ्या मुलाला बोलवले. त्या दोघांना बापाच्या संपत्ती मधे हिस्सा देणार नाही. कारण त्यांनीं लाथ मारली नाही. जर तुला संपत्ती हवी असेल तर मार लाथ. सगळी संपत्ती तुला देऊन टाकू.

    त्याने विचार केला. फक्त लाथ मारायची आहे. हा काही खरोखरचा बाप नाही. पुतळा तर आहे. लाथ मारली तर काय बिघडते?

   त्याने पुतळ्याला लाथ मारली. पुतळा तोडला. तो खुष झाला.

  पण जेष्ठांनी निर्णय दिला. या माणसाची संपत्ती मोठा मुलगा आणि मधला मुलगा यांच्यात वाटप करू. ज्यांनी बापाला लाथ मारली नाही. त्यांना लाज लज्जा शरम वाटली. संपत्तीचा त्याग केला पण बापाची हेडसांड केली नाही. हेच खरे शेतकरी बापाची औलाद आहेत.

तिसऱ्याला हिस्सा देणार नाही.

    निर्णय पक्का झाला. आईने पण या निर्णयाला सम्मती दिली.

   त्या जेष्ठांनी तिला एकांतात घेऊन विचारले. सांग, काय गडबड आहे?याने का लाथ मारली? आमचा तर्क आहे, हा तुझ्या पतीचा मुलगा नाही.

 तिने कबूल केले. “खरेच आहे. जेंव्हा माझे पती बाहेरगावी गेले होते तेंव्हा मला ऋत आली होती.मला राहावले गेले नाही. समोर फेरीवाला विक्रेता होता. सुंदर होता. त्याला घरात बोलवले. शय्या सोबत केली. त्यातून या तिसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. मी जरी माझ्या पतीला सांगितले नाही तरीपण कालमानाचे गणित करून त्यांनी तर्क केला होता. पण मला काहीच बोलले नाही. त्रास दिला नाही. घर संसार बरबाद केला नाही. माझा पती खूप सज्जन माणूस होता. ही संपत्ती सुद्धा त्यांनीच कमवली आहे. माझा काहीच अधिकार उरला नाही. ते जसे सांगून गेले तसेच करा. माझी हरकत नाही.”

    जो मुलगा मोठा झाल्यावर बापाची सेवा करीत नाही, अब्रू राखत नाही त्या विषयी असाच संशय बळावतो. याच्या उत्पत्ती मधे काहीतरी चूक झालेली असावी?

       शेतकऱ्यांची मुले शिकली. नोकरीला लागली. जर शेतकरी त्यांच्या कडे सरकारी कामासाठी गेले तर ते शेतकऱ्यांची कदर करीत नाहीत. सन्मानाने बोलत नाहीत. हाकलून देतात. लाच मागतात. नाही दिली तर गुन्हा नोंदवतात. मी खात्रीने सांगतो, असे नोकर शेतकऱ्यांची औलाद नसते.

   हाच सिद्धांत आमदार, खासदार, मंत्री यांना लागू होतो. जे शेतकऱ्यांची औलाद असतात ते बापाची कदर, आदर करतात. जे बापाच्या गैरहजरीत जन्माला आलेले असतात ते बापाची कदर, आदर करीत नाहीत.

    सरकारी नोकरांनो, ही बोधकथा आहे. जर तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांची अडवणूक करीत असाल, पिळवणूक करीत असाल तर घरी जाऊन आईला विचारू नका. “आई, खरे सांग मी कोणाची ओलांद आहे? “तो निर्णय आम्ही जेष्ठ नागरिक घेऊ, तुम्ही कोणाची औलाद आहात?

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here