जामनेर तालुक्यातील माळ पिंपरी येथील गट १०७ ची मोजणी साठी पैसे भरून अडीच वर्षे झाली.
गिरीश महाजन कडे मदत मागितली. त्या माणसाने मदत केलीच नाही. हा नालायकपणा नाही का?
आता बावनकुळे सुद्धा दोन वेळा जळगाव ला आले. काय काम केले? चेला चपाट्यांना भेटून गेले. काय उपयोग बावनकुळे महसूल मंत्री बनून? कशासाठी बनलेत महसूल मंत्री?
आमदार आणि मंत्री जर प्रशासकीय कामात मदत करीत नसतील तर त्यांचा पंचनामा केला पाहिजे.
आज २४/५/२०२५ नाशिक येथे भुमिअभिलेख ची मिटींग आहे
तर जामनेर तालुक्यातील माळ पिंपरी येथील शेतकरी सुरेश पंडित शिंगोटे, संजय पंडित शिंगोटे यांची जमीन गट नंबर १०७ मोजणीसाठी पैसे भरले. अडीच वर्षे झालीत. अर्ज केला. अजून कर्मचारी मोजणी करून देत नाहीत.
जर हे काम भारतीय भुमि अभिलेख अधिकारी करु शकत नसतील, त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसेल तर तर चीन पाकिस्तान करील काय? यासाठी डोनाल्ड ट्रम्पची परवानगी घ्यावी लागते का?
शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक ताटकळत ठेवणे कोणत्या सेवा क्षेत्रात येते. आपण स्वताला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतात आणि शेतकऱ्यांना आत्महत्या पर्यंत हैराण करतात.
पगार घेणे,लांच घेणे तरीही काम न करणे, हे मानवी कृत्य नाही.राक्षसी वृत्ती आहे.
महसूल मंत्री बावनकुळे दोनदा जळगावला आले. यांनी पण शेतकऱ्यांची कामाबाबत नोकरांना कोणताही आदेश दिला नाही. मग आलेच कशासाठी?
भाजपने कितीही नाटक, तमाशा केला तरी पण मंत्री नालायक, कामचोर, हरामखोर असतीत यांना चांगले कसे म्हणावे? मते मांगताना हात जोडतात, पाया पडतात. रामाचा वास्ता देतात. निवडून आले कि रावणा सारखे शेतकऱ्यांच्या छातीवर थयथय नाचतात.
महाजन आणि बावनकुळे कामचोर मंत्री आहेत. असा माझा अनुभव आहे. मानधन घेतात, मजा मारतात आणि खात्याचे काम करीत नसतील तर यांना चुलीत घालायचे का?
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७०९६३१२२




