राजुरा १३ मे
नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राजुरा तालुका महिला संघटीका
बबिता कांबळे यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. वडिलांच्या मृत्यू पश्चात त्यांची आठवण,स्मरण नेहमी डोळ्यासमोर असावे याकरिता प्रत्येक महीन्यात वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प बबिता कांबळे यांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील पठांगणात वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. यावेळी सूनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा, मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नेफडो, गुरूदेव सेवा मंडळ राजुराचे ह.भ.प. शैलेश कावळे, सूरेश बेले, प्रकाश उरकुंडे, देविदास वांढरे, प्रमोद साळवे, अनिल चौधरी, राजेंद्र मालेकर, परशुराम साळवे, उत्तम अवघडे, उज्वल शेंडे, गणेश कुडे, रामदास चौधरी, मारोतराव सातपुते, बाळासाहेब गोहोकार, लोमेश मडावी, प्रतिभा बोढे, नलिनी मेश्राम, सुवर्णा कावळे, अश्विनी वांढरे, शांताबाई लांडे, विमलबाई उरकुंडे आदींची उपस्थिती होती.




