Home अमरावती ” गुरू रविदास भवनाची निर्मिती हे समाजासाठी ऐतिहासिक कार्य ” – आमदार...

” गुरू रविदास भवनाची निर्मिती हे समाजासाठी ऐतिहासिक कार्य ” – आमदार मा.रविभाऊ राणा गुरु रविदास भवनाचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

97

 

अमरावती ( प्रतिनिधी )
” साईनगरच्या संत शिरोमणी गुरू रविदास महाराज बचत गटाने “गुरू रविदास भवन” येथे जे उभारलेले आहे ते समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक कार्य आहे.या कार्याबद्दल बचत गटाचे अध्यक्ष श्री पांडुरंगजी खंडारे व सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो.चौथ्यांदा मला सेवा करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या भवनामध्ये गुरू रविदास महाराजांच्या नावाने अभ्यासिका स्थापन केल्यास या अभ्यासिकेमुळे समाजातील गरीब मुलं – मुली एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करून उच्च पदावर पोहोचू शकतात. पंचवीस लाख रुपयाची देणगी मी या भावनांच्या कंपाऊंड, अभ्यासिका व भवनाच्या वरील बांधकामासाठी जाहीर करतो. माजी खासदार नवनीत राणा या खासदार नसल्या तरी त्यांची केंद्रामध्ये ताकद खासदारापेक्षा कमी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हृदयात ठेवून मी समाजाचे कार्य करीत असतो आणि त्यात मी यशस्वी होत आहे,हे लोकांना माहित आहे.जनतेची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि ते मी सतत करीत राहणार आहे.”
असे विचार आमदार मा.रविभाऊ राणा यांनी गुरू रविदास भवनाच्या भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्त उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.
ते साईनगर अमरावती येथील श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज बचत गटाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ‘गुरू रविदास भवना’ च्या भव्य लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनाच्या भाषणात विचार व्यक्त करीत होते.
लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक आमदार मा.रविभाऊ राणा,अध्यक्ष मा.पांडुरंगजी उ. खंडारे (अध्यक्ष,संत शिरोमणी रविदास महाराज बचत गट)
प्रमुख पाहुणे मा.प्रकाश शेलापूरकर (अध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था, अकोला ), प्रा.डॉ. श्रीप्रभू चापके (मुख्य मूल्यांकन अधिकारी, अमरावती विद्यापीठ), सचिनभाऊ भेंडे (शहर कार्याध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष),मा.भास्कर भटकर प्रा.अरुण बा. बुंदेले, मा.गव्हाळे महाराज,मा. नांदूरकर,मा.अमोल इंगळे होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी गुरू रविदास महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करून अभिवादन केले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी फित कापून व दीपप्रज्वलन करून नवीन गुरू रविदास भवनाचे लोकार्पण आमदार मा.रविभाऊ राणा यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्याचा प्रारंभ समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित “गुरू रविदास” वंदनगीताचे गायन करून केला .
दि.२७ एपिल २०२५ ला संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
“गुरु रविदास महाराज बचत गटाच्या एकीचा हा विजय आहे”, असे उद्गार या सोहळ्यात मान्यवरांनी काढले.
दानशूर आमदार मा.
रविभाऊ राणा यांचा याप्रसंगी गुरू रविदास महाराज बचत गटातर्फे सत्कार करण्यात आला. तथा मा.सचिनभाऊ भेंडे यांचा बचत गटातर्फे सत्कार करण्यात आला.

समाजकार्यासाठी सामाजिक बांधिलकी आवश्यक.
– मा.पांडुरंग खंडारे

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मा.पांडुरंगजी उ.खंडारे यांनी, ” गुरू रविदास भवन उभारण्यासाठी पंधरा लाख रुपये देणगी देणाऱ्या माजी खासदार नवनीतताई राणा आणि आमदार मा.रविभाऊ राणा यांचे तसेच
पंधरा लाख रुपयाचा निधी समाज बांधवांच्या वर्गणीतून प्राप्त झाला.वर्गणी देणाऱ्या या सर्व समाज बांधवांचे आभार
मानतो व गुरू रविदास भावनांच्या पुढील उभारणीसाठी समाज बांधवांना सहकार्याचे आवाहन करतो. समाजकार्यासाठी सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे.”असे विचार व्यक्त केले .
याप्रसंगी अध्यक्ष पांडुरंगजी खंडारे,प्रमुख अतिथी प्रा.डॉ.श्रीप्रभू चापके,मा.प्रकाश शेलापुरकर,मा.भास्कर भटकर, प्रा.अरुण बुंदेले,मा.योगेश पखाले यांनी मनोगत व्यक्त
केले.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्री सुरेश उ.पानझाडे ,प्रास्ताविक श्री दिनेश चापके तर आभार प्रदर्शन श्री रमेश गवई यांनी केले.
भवनाच्या उभारणीत व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत शिरोमणी रविदास महाराज बचत गटाच्या सर्व सभासदांनी व त्यांच्या परिवारांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सर्वश्री. पांडुरंग उकर्डाजी खंडारे,दिनेश गुलाबराव चापके,रमेश नारायणराव गवई,सुदाम मारोतीराव अंबाळकर,राजेंद्र शंकरराव मोहेकर,भाष्कर सुखदेवराव भटकर,प्रदीप पूर्णाजी भागवत,संजय नामदेवराव ढाकरे,शशीकांत कृष्णकांत डांगे,मनोहर रामकृष्ण शेगोकार,नरेंद्र माणिकराव खंडारे,सुरेश उकर्डाजी पानझाडे,दादाराव रामचंद्र इंगळे,गणेश पूर्णाजी इंगळे, दिलीप शामरावजी मोहोकर , रमेश जानरावजी शेगोकार , प्रल्हाद किसनराव खंडारे, वासुदेव आत्मारामजी सावळे,सुरेश दिगांबरराव खंडारे, सौ.जयश्री श्रीप्रभू चापके,सौ. ज्योती सुरेशराव पानझाडे, श्रीमती कल्पना अनिलराव बोडखे,सौ.जयश्री गणेशराव इंगळे,प्रशांत किसनराव विरुळकर,सौ.तृप्ती शशीकांत डांगे,किशोर किसनराव इंगळे,रमेश देविदासराव काळे,नितीन कृष्णरावजी भागवत,दिलीप रामराव पानझाडे,संजय रामदासजी जोगदंडे, दीपक किसनराव इंगळे, रवि देविदासराव किटे, प्रमोद शंकरराव शेगोकार,
क्रिष्णा संभाजी वाघमारे,अतुल रामेश्वर डवरे,पवन सुखदेवराव ठाकरे,आकाश रामेश्वर जामठे, सौ.संध्या उत्तमराव इसाळकर, सौ.नलिनी दिनेशराव चापके, सौ.रेखा रवींद्र खंडारे आदींनी गुरु रविदास भावनांच्या उभारणीत सक्रीय सहभाग घेऊन उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले.
याप्रसंगी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सोहळ्याची सांगता स्नेहभोजनाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here