जयभीम का नारा गुंजेगा, देश के कोणे कोणे मे! आता देशाला नाही तर संपूर्ण जगाला जयभिम हा शब्द माहित झालेला आहे. जयभीम हा शब्द एल.एन. हरदास नागपूर यांनी पहिल्यांदा उच्चारला आणि पहाता, पहाता इतका प्रचलित झाला की संपूर्ण देशात जयभिम लोक मोठया अभिमानाने बोलायला लागले.
जयभीम म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करणे म्हणजे जयभिम होय. एखादा व्यक्ती समोरून येत आहे तर त्याला दुसरी व्यक्ती जयभिम म्हणत असेल तर ते त्याचा सन्मान करतात असा त्याचा अर्थ होतो त्याच बरोबर त्या वेळेस ती व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ही एकप्रकारे आदर करतात असा त्याचा अर्थ होतो. या जयभिम बोलण्यामुळे दोन व्यक्ती मध्ये एक वैचारिकता असल्याचे जाणवते. त्याच्या त चांगुलपणा असल्याचा प्रथम दर्शनी भास होतो. आणि अंतिमही क्षणा पर्यंत चांगले राहण्याचा त्याचा संकल्प असतो असे जाणवते. आता जयभिम हा शब्द लोकांच्या हृदयात पोहचला आहे. या जयभिम शब्दा मुळे काही लोकांना धडकी भरायला लागली आहे. त्यामुळे ते व्हायात सारखे बोलायला लागले आहे. त्याना वाटते जर जयभिम चा खऱ्या अर्थाने अर्थ लोकांना कळला आणि त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने हा भारतीय समाज मोठया प्रमाणात गेला तर आमच्या मंदिरातील पुजारी यांचे ऐकेल कोण? ही भीती काहींना आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माल ची दिक्षा घेतली आणि स्वतः बावीस प्रतिज्ञा केल्या. पुढे पाच लाख त्याच्या अनुयायांना त्यानी तशी इच्छा व्यक्त केल्याने बुद्ध धम्माची दिक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या, आणि ते बुद्ध विचार धारेने जाण्यासाठी कटीबद्द झाले. ते सनदशीर मार्गाने जाण्याचा निर्धार करू लागले लोकांना सत्य सातत्याने सांगू लागले काहींना वाटले आपले पितळ उघडे पडेल ही भीती त्याना वाटू लागले आणि त्यानी षडयंत्र करून लोकां च्या मनात कलुशीत भावना उत्पन्न निर्माण केली आणि पुन्हा आपसात संघर्ष करायला लागले आणि भारतीय समाजाची प्रगती पाहिजे त्या प्रमाणात न होता बाधा आली. ही वास्तविकता केव्हा हा भारतीय समाज समजू शकेल सांगता येत नाही. पण जो पर्यंत वास्तव हा भारतीय समाज समजणार नाही तो पर्यंत तो अन्याया च्या विरोधात उभा ठाकणार नाही. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलामाला, गुलामीची जाणीव करून दया म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल या सर्व अर्थाने जयभिम म्हणून सन्मान पूर्वक बोलणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ती ही की भारतीय राज्य घटनेचे संरक्षण करणे,आणि राज्य घटनेचे राज्य निर्माण करणे. आणि ते जर खऱ्या अर्थाने झाले तर खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण झाला असा त्याचा अर्थ होईल आणि सर्व भारतीय समाज सुखी होईल. भ्रष्टाचार मुक्त भारत, द्वेष मुक्त भारतीय समाज, शोषण मुक्त समाज, निर्माण करण्याच स्वप्न जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे होते ते पूर्ण होईल. म्हणजे पूर्ण भारतीय समाज सन्मान पूर्वक जयभिम म्हणेल. तेव्हा खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारा वास्तववादी शब्द म्हणजे “जयभीम” होईल. त्यासाठी जयभिम म्हणणाऱ्या प्रत्येकाने संकल्प करून काम केले पाहिजे. आणि म्हणून काही जयभिम या शब्दाचाच विरोध करू लागले.त्याना हे माहित नाही की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळाला,स्वातंत्र्य मिळाले,विषमता दूर झाली,आर्थिक उन्नती झाली, सामाजिक प्रतिष्ठा वाढली. देशाची प्रतिष्ठा वाढली.
आज संपूर्ण जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जागतिक विद्वान म्हणून ओळखले जाते. अमेरिकेत तर कोलंबीया विद्यापीठाणे अगदी विद्यापीठा समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फुटाचा पुतळा बसवीला आहे, आणि त्या खाली सिंबाल आफ नालेज ज्ञानाचे प्रतीक म्हणून लिहल्या गेले आहे. त्या विद्वान महा पुरुषाचे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याचा सन्मान करणे म्हणजे जयभीम होय. जयभिम हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो, एक बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान ही करण्याच्या हेतूने आणि समोरील व्यक्तीचा आदर करण्याच्याही दृष्टीने वापरला जातो. हे बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचा द्वेष करणाऱ्या माणसाने समजून घेतले पाहिजे. मागे संसद मध्ये आपल्या देशाचे सन्माननिय, गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर यह बोलना तो फ्याशन हो गयी है! इतनी बार अगर तुम भगवान का नाम लेते तो सात जन्म तक स्वर्ग मे जगा मिल जाती. असे वाक्य एक प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडविण्याच्या दृष्टीने बोलले असे संसद सदस्य यांना वाटले आणि सर्वांनी जय भिम, जय भिम, जय भिम असा नारा दिला तो नारा सर्व समावेशक होता. जात, पात, धर्म याही पलीकडे जाऊन त्यानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी असा सर्व समावेशक सुरु निघाला आणि संपूर्ण देशातून मोर्चे निघाले अनेक विधानसभा मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भाषणे झाली, अनेक ठिकाणी निषेध सभा झाल्या, मोर्चे झाली, रास्ता रोको आंदोलने झाली, धरणे आंदोलने झाली ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक टिप्पनी केल्यामुळे झाली हे अलीकडील चार महिन्या पूर्वी घडलेली घटना आहे. त्यामुळे कोणीही जयभिम या शब्दाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करू नये. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करू नये. बाबासाहेब जागतिक विद्वान आहे, ते अनेकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,या सर्व बाबतीत प्रगती करणारे आधार स्तभ आहे. अनेकांचे ते प्राण आहे. ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहे. प्रसिद्ध समाज सेवक होते. ते समानतेचे पुरस्करते होते. त्याच्या सन्मानार्थ जयभिम हा शब्द आहे. जयभिम !!!
अविनाश टिपले, चंद्रपूर मो. 9970917389




