Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे महात्मा फुलें आम्हाला कधी समजतील…?

शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे महात्मा फुलें आम्हाला कधी समजतील…?

83

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी जन्म झाला असता गोविंदराव फुले यांना ज्योतिबा फुले यांच्या जन्मामुळे ब्राह्मणवादी संस्कृतीला छेद देऊन सत्यशोधक समाजाची स्थापना होईल याची प्रचिती नव्हती भारतीय संस्कृती मधील जाती जाती मधील उतरंड महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखून मनुष्याच्या शोषणाचे मूळ लक्षात घेऊन त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले ” विद्या विना, मती गेली,मती विना, नीती गेली, नीती विना,गती गेली, गति विना,वित्त गेले,वित्त विना,शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले ” याच वैचारिक ज्ञानातून त्यांनी समग्र सामाजिक क्रांतीला सुरुवात करत ब्राह्मणवादी संस्कृती विरुद्ध बंड पुकारत अत्यंत काळजी पूर्वक शैक्षणिक क्रांती ची धुरा हाती घेत संपूर्ण भारतीयांना गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढत सामाजिक परिवर्तनाची लढाई लढली. विषमतेवर आधारित ब्राह्मण धर्माची परिमिती लक्षात घेता त्यांनी सामाजिक, धार्मिक,आर्थिक विषयाला महत्त्वाचे स्थान देऊ ब्राह्मण नीतीला ओळखले.तमाम बहुजन समाज गुलामगिरीत अडकल्या मुळे ” शिक्षणाशिवाय तरुणनोपाय नाही ” हे लक्षात घेऊनच सावित्रीबाई फुले यांनाही सामाजिक क्रांतीची लढाई मध्ये सहभागी करून घेतले. शेतकऱ्याची दुरावस्था पाहत असताना शेतकरी यांच्या विषयी अत्यंत तळमळीने त्यांनी 18 जुलै 1883 रोजी ” शेतकऱ्याची आसूड ” ग्रंथ लिहून शेतकऱ्याची दयनीय अवस्था आणि त्यावरील उपाय लिहीत त्यांनी शेतकरी गुलामगिरीतून कसा मुक्त होईल याचा मार्ग ग्रंथामधून विशद केला आहे. तत्कालीन सामाजिक विषमता असल्यामुळे शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही परंतु महात्मा फुले यांनी 1883 च्या एप्रिल महिन्यात मुंबई पुणे परिसरात जुन्नर,ओतूर,हडपसर वग्नी,माळ्याची कुरुल इत्यादी गावामध्ये वाचन केले सांगण्यात येते.मूलमंत्र लक्षात घेता प्रत्येक अन्यायाचे कारण लक्षात घेऊन शिक्षणाकडे सर्वांनी लक्ष द्यावे. असे वेळेवर महात्मा फुले सांगत असत त्यातूनच 19 व्या शतकात मुलां बरोबर मुली ही शाळेत जायला लागल्या एवढेच नाही तर शेतकरी बांधव आपले शेत गहाण ठेवून मुलांना बाहेरगावी सुद्धा शिकण्या साठी पाठवत असत त्यामुळेच त्यांना स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते सत्यशोधक समाजाचे आद्य क्रांतिकारक म्हटल्या जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक,धार्मिक,आर्थिक यावर मोठ्या प्रमाणे क्रांती करत असताना तळा -गाळातल्या मागासवर्गीयही प्रवाहामध्ये समाविष्ट करून सामाजिक क्रांतीची ज्योत तेवत ठेवली. सामाजिक क्रांती करत असताना पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुले करत सामाजिक क्रांतीची सुरुवात त्या परिस्थितीत शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवली. आज परिस्थितीला शेतकरी आत्महत्या सारख्या बातम्या दैनंदिन घडत असताना शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर विचार मंथन करणारे महात्मा फुले आपण कधी समजून घेणार..?

*राहुल साबणे गंगाखेड 8149417161*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here