Home पुणे देव राक्षसांच्या कैदेत!

देव राक्षसांच्या कैदेत!

131

कथानक आहे. रावण राजा इतका प्रबळ झाला होता कि, त्याने देवांना कैद करून ठेवले होते. तेंव्हा या जगाचा कारभार देवांवाचून चालत होता. जसा आज चालत आहे. आता हिंदू राक्षसांनी राम, कृष्ण, महादेव इत्यादी देवांवर कब्जा मिळवला आहे. काही चोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अधिकार सांगितला आहे. कोणीही उठतो, दोन पेग मारतो, आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर अधिकार सांगतो. सज्जनांनी, विद्वानांनी त्यावर काहीच बोलू नये. बोलले कि हे ताबडतोब मुसलमान धार्जिणे म्हणतात. राक्षस राजे त्यांना दारू पाजून दंगा करायला लावतात. हा चिंताजनक विषय आहे.

    अशीच चिंता तेंव्हाचे साधू संतांना वाटली होती. आता कसे करायचे?आपले कसे होणार? म्हणून जिकडे तिकडे देवांची शोधाशोध झाली. प्रत्येकाने आपली आपली तऱ्हा वापरली. जसे पोलिस मिसींग पर्सनला शोधण्यासाठी वापरतात.

      एका बुद्धिमान महिलेने थेट लंका गाठली. तेथे राक्षस मंडळी राहाते. तर दारू मटणचा शौक असेलच. म्हणून तिने मटण तर नाही पण दारू विकण्याचा बहाणा केला. तिची दारू तेथील राक्षस, रक्षक, भक्षक प्याले. जास्त चढल्यावर बरडू लागले. जसा एक राक्षस बरडला होता. मी काय धरणात मूतू? पाऊस तर पडत नाही. धरणात पाणी साचत नाही. म्हणून मी धरणे न बांधता तो पैसा स्वतासाठी ठेवून घेतला. यात कसला भ्रष्टाचार?

    लंकेतील राक्षस, रक्षक, भक्षक बरडले. आम्ही आणि आमचे राजे रावण इतके शूर वीर आहोत कि, सर्व देवांना कैद करून ठेवलेले आहे. हे कोणालाही माहीत नाही. शिवाय त्या जागेवरून फोन ची रेंज नसल्याने देवांचा कोणाशीही संवाद होत नाही. आजही हिंदू देव देवतांचा जनसंपर्क तुटलेला आहे. ते दगडांच्या टोलेजंग इमारतीत बंदिस्त झाले आहेत. बाहेर रक्षक उभे करून ठेवलेले आहेत. नो एन्ट्री! दूरसे देखो. बात मत करो. भगवानकी तबीयत ठिक नही हैं.

       त्या महिलेने त्या रक्षकांना जास्त दारू पाजली. पैसे पण मागितले नाही. त्यांची सामान्य बुद्धी असामान्य बनली. अशा अवस्थेत त्यांनी पुरावा म्हणून त्या महिलेला ती कैद दाखवली. खात्री केल्यानंतर ती बातमी त्या महिलेने इकडे साधू संतांना सांगितली. तेंव्हा देवांची सुटका करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. अखेर देवांची सुटका झाली.

    आज पुन्हा हिंदूंचे देव हिंदू राक्षसांच्या कैदेत आहेत. भारताचा कारभार देवांवाचून चाललेला आहे. राक्षस राजे त्यांना हवे तसे आदेश काढतात. कैदेतील देवांचा हवाला देतात. हा देवांचा आदेश आहे. भोळे भाबळे हिंदू लोक भयापोटी ते खरे मानतात. क्वचितच बुद्धिमान, सज्जन, साधू संत यावर आक्षेप घेतात. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राक्षस राजे करीत आहेत. काहींचा तर खून केला आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंके. राक्षसांच्या राज्यात बुद्धिमान, नितीमान लोक अडसर ठरत आहेत.

       महाराष्ट्र आणि भारतातील रोजच्या घटना पाहाता गुंड, गुन्हेगार, खुनी, दरोडेखोर हे राक्षस राजांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. सज्जनांचे मुडदे पाडण्याची जबाबदारी त्यांचेकडे सोपवलेली आहे. मरतांना पाणी मागितले तर मुत्र देत आहेत. याचे दुःख फडणवीस राजाला कधीच झाले नाही. रावण राजा इतका क्रूर होता का?

     बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी, प्रामाणिक लोकांना ईव्हिएम नकोच. जनतेला नको पण मोदींना का हवे आहे? नरेंद्र मोदी कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नाहीत. ते राजा रावणाच्या मानसिकतेत असावेत. आले मोदींच्या मना तेथे देवांचे ही चालेना! सब भगवान मेरी मुठ्ठीमे!म्हणजेच देव मोदींच्या कैदेत असावेत.

    फडणवीस गृहमंत्री असतांना बीड मधे खून, दरोडा, खंडणी प्रकरणे राजकीय वरद हस्ताने चालवली. वाढली. अतिरेक झाला. लोक बोंबाबोंब करू लागले. तरीही फडणवीस ढिम्मच. हे आता देवांनाही जुमानत नाहीत. म्हणजेच देव यांच्या कैदेत असावेत.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here