Home महाराष्ट्र शहरातील मेलेली माणसे आणि संवेदनाहीन समाज!

शहरातील मेलेली माणसे आणि संवेदनाहीन समाज!

216

जळगाव शहरातील रस्त्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे. दरमहा चार पाच अपघात होऊन बाया, पोरं, माणसे मरत आहेत. त्यांचे फोटो, व्हिडिओ,बातमी बनवणे , प्रसार करणे हा अल्लड प्रकार आहे. पण गंभीर विचार होत नाही. कि हे कसे थांबवता येईल?

      आकाशवाणी चौकातील सर्कल जाणिवपूर्वक मोठे बनवले आहे. जे फक्त १४ फुट व्यासाचे बनवण्याचे उदिष्ट असतांना २८ फूट व्यासाचे बनवले. ते काम करणारा सुपरवाईझर अभियंता गोपाल यादव स्वतः म्हणाले कि, “इतना बडा सर्कल हमने कहींभी बनाया नहीं.”

 तर मग येथेच का बनवले असेल?असे बनवण्यात कोणाचा तरी दुष्ट हेतू, आदेश असलाच पाहिजे.जर हा रस्ता, हे सर्कल जळगाव शहरातील नागरिकांच्या करातून, शहरातील नागरिकांच्या रहदारीसाठी बनवले तर मग उपभोक्ता नागरिकांचे मत विचारात घेतले पाहिजे. अनेक लोकांनी, संघटनांनी या मोठ्या आकार विरोधात बोभाटा केला, आंदोलने केली, तक्रारी केल्या. तरीही हा हट्ट कशासाठी? कोणासाठी?का बनवले, इतके मोठे?

     मला वाटते जळगाव शहरातील कामकाजावर स्थानिक नागरिक, स्थानिक नेते यांना डावलून बाहेरील दुष्ट शक्ती जास्त हावी झाली आहे. पारंपारिक भाषेत, याला बाहेरची बाधा म्हणतात. भूत बाधा. सैतानी बाधा.

      जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे पैसा कमावतात, पैसा देतात म्हणून निवडून येतात. पण आमदार म्हणून ते खंबीर आणि गंभीर नाहीत. फक्त सण, उत्सव नव्हे अपघात, मृत्यू सुद्धा त्यांचे प्रसिद्धीचे फंडे बनलेले आहेत. ते कधीही ठोस भुमिका घेत नाहीत कि, ही माझ्या मतदारांची मागणी आहे तर हे असे झालेच पाहिजे. इतके साहस, धाडस, नैतिक बळ त्यांच्यात नाही. आर्थिक बळ वाढले कि नैतिक बळ नष्ट होते.

      सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी या काळात जळगाव मधे येऊन नैतिकतेवर प्रवचन करून गेले. भाजपच्या एकाही आमदारांनी, एकाही पदाधिकाऱ्यांनी त्यांचेकडे याबाबत तक्रार केली नाही. मग काय केले?गडकरींचे पाय चेपले. खुशामत केली. सेल्फी काढून मिरवली. माझ्या शहरातील बाया, पोरं माणसे मरत असतील तर मी गडकरींना माननीय, सन्मानिय, आदरणिय, नामदार कसे म्हणावे? चीड येते,गडकरींची.

       जळगाव शहरातील होणारे अपघात सुद्धा संवेदनाहिन वाटतात. ज्या बाया, पोरं, माणसांचे अपघात झाले, त्यांनी कधीही उखडलेला रस्ता, अवाढव्य सर्कल विरोधात आवाज काढला नाही. किंवा कोणी काढला तर साथ, समर्थन केले नाही. उलट अशी आंदोलने पाहुन गुपचूप खाली मान घालून गाडी पळवली. जसे आमचा या विषयाशी काहीच संबंध नाही. आम्ही फक्त आमच्या कामधंदा पाहू. ती जबाबदारी या लोकांची आहे, जे नेहमीच आवाज उठवतात. आंदोलने करतात. जळगांव शहरातील अपघातात सापडलेला, मेलेला माणूस किंवा महिलांनी कधीही सार्वजनिक समस्यांकडे लक्ष दिले नाही. वेळ दिला नाही. कारण ते संवेदनहिन आहेत. संवेदनाहिन माणसे आणि महिला नेहमीच गाडी, माडी, साडी, चोळी, पोळी यात व्यस्त असतात. त्यांचे तितकेच विश्व असते. मी असे अपघातग्रस्त लोकांना जाऊन भेटलो. जाणून घेतले.ते फक्त रडतात. लढत नाहीत. बोलायला, लढायला तयार होतच नाहीत. त्याचीही कारणे शोधून काढली. या लोकांनी मतांचे पैसे घेतलेले असतात. यांनी फुकटचे घरकुल, राशन, शेगडी, भांडी, साडी घेतलेली असते. त्यामुळे हे बाहेरून जिवंत आणि आतून मेलेले असतात. जर हे चूकून आंदोलन समयी फोटोत, व्हिडिओत दिसले तर नगरसेवक आणि आमदार यांना घरी येऊन दम देतात. “का रे! जास्त शहाणा झालास का? मताचे पैसे घेतांना लाज नाही वाटली का?”

    ज्या लोकांनी उखडलेले रस्ते, अवाढव्य सर्कल विरोधात आवाज उठवला त्यांचे अपघात झाल्याचे उदाहरण आढळत नाही. कारण ते संवेदनशील आहेत. ते मत विकत नाहीत. ते मत खरेदी करीत नाहीत. ते फुकटचे घेत नाहीत.

    फुकटचे घेऊन खाल्लेला माणूस किंवा महिला आतून मेलेला असतो. असतो फक्त मनुषसदृष प्राणी.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here