मित्रांनो, कुटुंबव्यवस्था , समाजव्यवस्था टिकवून ठेवणे खूप आवश्यक आहे. आज पार बिघडली आहे. त्यामुळे घरातील जेष्ठ आई बाबा लावारिस झाले आहेत. काही तर मुले असूनही एकटे राहातात. धन दौलत जमीन जुमला खूप कमवला. जतन केला तरीही मुले आई बाबांना सोबत ठेवत नाहीत. काही मुले उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनलेत. कोणामुळे ?बाबा मुळे. तरीही वागवत नाहीत. हिच मुले बाहेर लोकांत गाडी, बंगला, बायको मिरवतात. धर्म, संस्कृती वर व्याख्यान, प्रवचन, नाटक,भजन, उत्सव करतात. बाप रे! भयंकर वाईट परिस्थिती आहे.
मी जळगावचा माणूस. इतर ठिकाणी असेल नसेल पण येथे तर मी अनेक जेष्ठ पितरांना भेटतो. कधी तेच मला येऊन भेटतात. कैफियत मांडतात.
पैकी काही तर बिचारे वृद्धाश्रमात वनवास भोगत आहेत. इतर ठिकाणी फोटोग्राफर सोबत बोलवून वह्या, पुस्तके, कपडे, खाऊ वाटणारे उच्चभ्रू मुले मात्र आई बापाला वृद्धाश्रमात भेटायला जात नाहीत. म्हणे इतरांना कळले तर बदनामी होईल. बदमाषी केल्यावर बदनामी टळते का? प्रसार होतोच. दुर्गंधी दूरवर पसरते.
जर बायको सोबत येत नसेल तर मुलगा तर चोरून लपून आई बापाला भेटू शकतो. जर परक्या बाईला चोरून लपून भेटू शकतो तर आपल्या पितरांना का नाही भेटू शकत?मुळातच भेटायची इच्छा नसते.
आईबाप आणि मुले यांना मी स्वतंत्रपणे भेटलो तर कळते कि अचानक नोकरी किंवा व्यवसाय मिळाल्याने मुले हाय प्रोफाईल जगायला लागली. आणि आईबाप मात्र जुनी सवय सोडत नाहीत. काटकसर, कंजुषी सोडत नाहीत. त्यामुळे एकमेकांना अडचण होते.
शिवाय कपडे, आज पेहराव अचानक बदलला. जळगांव, धुळे मधील जोडपी इंग्लंड अमेरिका सारखे राहायला लागली. तर जेष्ठ, खास्ट लोकांना पाहावत नाही. ते कटकट करतात. कोणी ऐकत नाही म्हणून दारू न पीता बडबड करतात. वेडसर ठरतात. म्हणून मुले, सुना, नातरे जवळ ठेवत नाहीत.
मला वाटते, आई बापाने मुलांवर केलेले संस्कार उलट फिरणार तर नाहीतच. ती चूक दुरूस्त होणार नाही. मग आपण काय करू शकतो?
जे मुले आईबाप सोबत ठेवत असतील, सुना सासू सासरे सोबत राहत असतील त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे. सत्कार एकाचा पण शिकवण दुसऱ्याला. असा हेतू ठेवून कार्यक्रम केले पाहिजे.
गावात, शहरात काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर जेष्ठ सभासद असतील तरच वर्गणी दिली पाहिजे. जेणेकरून ज्येष्ठांच्या हाती संस्कृती दिसेल. त्यांचा यथोचित मान सन्मान होईल. धार्मिक, नैतिक व्याख्याने, प्रवचने होतील. इतर जेष्ठांना आपलेपणा वाटेल. मनातील खंत मांडता येईल. मन हलके होईल. याचा चांगला संदेश ज्येष्ठांच्या मुलांना पोहचेल. कोणी म्हणेल, ते बाबा छान बोलले. तेंव्हा मुलगा म्हणेल, ते माझे वडिल आहेत. सून म्हणेल, ते माझे सासरे आहेत. माझे म्हटले तरीही बरे वाटेल.
गावात, शहरात जर चोर, भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगारांचे सत्कार होत असतील तर टाळले पाहिजे. अचानक केला तर टाळी वाजवू नये. ते मुद्दाम चहा, जेवण वगैरे देतात. गर्दी जमवतात. स्वताचा सत्कार करवून घेतात. मंडळांना पैसे देऊन सत्कार करवून घेणारे ओळखले पाहिजे. अशी माणसे कधी देवी देवतांचा आधार घेतात. कधी महापुरूषांचा आधार घेतात. कधी तर जातीचा आधार घेतात. पेपरला पैसा देऊन फोटो छापून आणतात. येथे पेपरवाला आणि टिव्ही पेक्षा नागरिक जास्त सावध झाला पाहिजे. चोरांचे, गुंडांचे फोटो पेपरला दिसले कि त्यावर पोरगं हागवले पाहिजे.
मी तर स्वतः तरूणांच्या टोळक्यांना वर्गणी देत नाही. माझी पोलिसांना सुचना आहे कि, किमान निम्मे सदस्य जेष्ठ असल्याशिवाय मंडळांना कार्यक्रम साठी परवानगी देऊच नये. त्यामुळे धांगड धिंगाणा कमी होऊन पोलिसांचा बंदोबस्तबाबतचा त्राण कमी होईल. पोलिस सुद्धा कधीतरी रिटायर होणारच आहेत.
माझे जवळपास ची मंडळे घरोघरी जाऊन आग्रहाने वर्गणी मांगतात. देणगी म्हणतात पण ती खंडणीच असते. जमवलेल्या पैशातून शेवटी दारू मटण ची पार्टी करतात. त्यातूनच गॅंगस्टर तयार होतात. मुंबई, पुणे, नाशिक आणि आता बीड,परळी मधे असेच गॅंगस्टर तयार झाले आहेत.
जळगांव महानगरपालिका मधील ७५ पैकी ३० तर असेच गुंड निवडून आले आहेत. तुमच्या गावात सज्जन लोक नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२




