अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.26फेब्रुवारी):-शब्दास्र विचार मंच, आंबेडकरी प्रेरणा नाट्य मंच प्रणित आंबेडकरी विचार वेध विद्यार्थी संघ, माता क्रांती ज्योती रमाई उपासिका संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त, सत्कार समारंभ आणि परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन , वज्रदीप हॉल प्रशांत नगर अमरावती येथे २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
सत्कार समारंभ कार्यक्रमांचे अध्यक्ष टी. एफ. दहिवाडे, प्रमुख अतिथी मा.विशाल मोहोड, मा.डॉ.कविता मेश्राम, अरुण वानखडे (तथागत टी. व्हि. चॅनल संचालक), विद्रोही अविनाश गोंडाणे, प्रा.देवानंद पाटील, दिलीप शापामोहन,
शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे, मधुभाऊ हिरेकर होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार सन्मानपत्र पुष्पगुच्छ व पंचशील शाल देऊन आयोजक शब्दस्र विचार मंचचे प्रमुख प्रवीण कांबळे व प्रेरणा नाट्य मंचचे प्रमुख मधुभाऊ हिरेकर यांनी केला.
——
*मान्यवरांच्या भाषणातून*
*झाले समाजप्रबोधन*
थरांच्या विचाराची पेरणी करणारे लेखक आवश्यक-टी.एफ.दहिवाडे
” लेखक,कवी हा वास्तव समोर ठेऊन लेखाणीतून व्यक्त होतो. तो साहित्यिकांनी महापुरुषांच्या – थोरांच्या समतेच्या विचारांची पेरणी करण्याची आज गरज आहे. लेखक, कवी हा माणसाचे जगणे मांडतो. तो माणसाला दिशा दाखविण्याचे काम करतो. साहित्यिकांनीआपल्या लेखणीतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य केले पाहिजे.” असे विचार अध्यक्षीय भाषणातून टी.एफ.दहिवाडे त्यांनी व्यक्त केले.
साहित्यिक चळवळ टिकणे काळाची गरज-विशाल मोहोड
” देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या थोरपुरुषांच्या जयंती, स्मृतीदिनाच्या निमित्ताने असे साहित्यिक कार्यक्रम झाले पाहिजे. कारण आज साहित्यिक चळवळी टिकण्याची गरज आहे. त्यातून थोर पुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीला माहीत होणार आहेत. त्यांचा आदर्श छ. शिवाजी, डॉ.बाबासाहेब,स्वामी विवेकानंद असे असायला हवे.” असे विचार प्रमुख अतिथी कादंबरीकार विशाल मोहोड यांनी व्यक्त केले.
भीम लेखणीतून समाजप्रबोधन होणे आवश्यक- डॉ.कविता मेश्राम
” लेखक ,कवी यांनी आपली भीम लेखणी समाज प्रबोधनासाठी खर्ची घालून समाज परिवर्तन घडवून आणावे आणि फुले – शाहू – आंबेडकरांचे स्वप्न साकार करावे.” असे विचार प्रमुख अतिथी डॉ.कविता मेश्राम यांनी व्यक्त केले.
सत्कारातून लेखनाची प्रेरणा मिळते-प्रा.देवानंद पाटील
” लेखक, कवी,गझलकार यांचा जो सत्कार झाला या सत्कारामुळे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांच्याकडून सकस साहित्याची निर्मिती होते .”असे विचार प्रमुख अतिथी प्रा.देवानंद पाटील यांनी व्यक्त केले .
मा.दिलीप शापामोहन, मा.विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी सत्कार कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
*मान्यवर साहित्यिकांचा सत्कार*
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक, कवी, लेखक,सामाजिक कार्यकर्ते प्रा.अरुण बुंदेले, प्रशांत दामले, नागोराव सोनकुसरे,गोवर्धन रामटेके, पदमा घरडे,ठवरे गुरुजी,प्रा.हंसराज रंगारी,प्रेरणा पांडे, मयुर गायकवाड,किरण शहारे, विजय पाटील,राष्टपाल घरडे, प्रकाश अंभोरे, दिनेश टेंभुर्णे,दिनेश मेश्राम, श्री. न.डोंगरे,सिद्धार्थ गोंडाने, सुशांत मेश्राम,साहेबराव नाईक, रतन भस्मे, सुजाता मेश्राम, सुनिता रायबोले, नरसिंह परमार,अंबादास वानखडे, सावित्री चंद्रिकापुरे,निलेश कीर्तक, सागर गडलिंगे,आदी साहित्यिक, कवी, लेखक,सामाजिक कार्यकर्ते यांचा दुपट्टा,सन्मान पत्र आणि पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
*परिवर्तनवादी विद्रोही कविसंमेलनातून क्रांतिकारी विचारांचा जागर*
विद्रोही अविनाश गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिवर्तनवादी विद्रोही कविसंमेलनात,सहभागी कवी नरसिंह परमार, प्रा.अरुण बुंदेले,प्रशांत दामले, सुनिता रायबोले,प्रेरणा पांडे, निलेश कीर्तक, मयुर गायकवाड, पदमाताई घरडे, ठवरे गुरुजी, हंसराज रंगारी, मधुभाऊ हिरेकर,दिलीप शापामोहन, विशाल मोहोड,सावित्री चंद्रिकापुरे, नागोराव सोनकुसरे, विद्रोही प्रवीण कांबळे,सुशांत मेश्राम,गोवर्धन रामटेके आदी कवींनी परिवर्तनवादी – विद्रोही कविता सादर केल्या.
कविसंमेलनाध्यक्ष विद्रोही अविनाश गोंडाणे यांच्या
“प्रिय मित्रा,
तुला सापडलंय घबाड –
तु झालास लबाड….
मलाही सापडलंय घबाड
पण…
मी नाही झालो लबाड.!
तुला सापडलंय घबाड,
मला सापडलंय बाबाचं क्रांतीचं घड्याळ,
बांधलंय हाताला काकण म्हणून….
तु पिचकलास सोन्याच्या घबाडाखाली,
तु विरलास…थांबलास..!
मी गरागरा फिरतोय,
क्रांतीच्या घड्याळासोबत शांतीपुरूष बनुन.!
मी धम्म चक्रासोबत २४ आऱ्यांवर अंग टाकले,
तरीही फाटलो नाही.
मात्र…! तु सोन्याच्या घबाडाखाली दबलास,
पुन्हा छिनाल संस्कृतीचा गुलाम ठरलास.
दु:ख मात्र होतोयं –
पण..! तु बाबांच्या समाजाचा घटक ना..?
मागे पुढे सारा समाजच असा झाला तर.?
बाबांच्या तत्वाचे खरे आहे काय..?
समाजाचे बरे आहे काय..?
तुच ठरवं अन् उलट टपाली कळवं,
नाही तरी माझ्या सोबतीला–
२४ आरे आणि क्रांतीचं घड्याळ आहेचं!!”
कविसंमेलनाचे अध्यक्ष अविनाश गोंडणे यांच्या या अध्यक्षीय कवितेने कविसंमेलनाची सांगता झाली.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ गोंडाने यांनी केले तर कविसंमेलनाचे संचालन सुशांत मेश्राम यांनी केले.आभार मधुभाऊ हिरेकर यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्यिक व श्रोते उपस्थित होते.




