Home महाराष्ट्र रेल्वे लाईनच राहणार नाही तर उड्डाणपुलाचा हट्ट कशाला

रेल्वे लाईनच राहणार नाही तर उड्डाणपुलाचा हट्ट कशाला

236

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.26फेब्रुवारी):- गंगाखेड येथील हॅप्पी स्टे लॉजिंग हॉलमध्ये दिनांक 25 फेब्रुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान परभणी लोकसभेचे खासदारसंजय जाधव यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली.दुहेरी रेल्वे लाईन दोन ते तीन किलोमीटर बाहेरून जाणार असून या रेल्वे लाईन पुढील दोन वर्षात पूर्ण होणार होईल असे या वेळी पत्रकार परिषद खासदार यानि सांगण्यात आले. तसेच या उड्डाण पुलाबाबत आमदार रत्नाकर गुट्टे यांचे स्वहिताची भूमिका असून तर माझी लोकहिताची भूमिका आहे.

असा पालटवार खासदार यांनी केला आहे.जिथे रेल्वे लाईनच राहणार नाही तिथे उड्डाणपुलाची आवश्यकता काय आहे असा प्रश्न उपस्थित केला असून स्वतःच्या हितासाठी उड्डाणपुला चा प्रश्न लावून धरल्याचा जाहीर आरोप खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद मध्ये केला आहे पुढे खासदार म्हणाले की गंगाखेड येथीलउड्डाण पूल होऊ नये ही स्थानिक व्यपारांची ठाम भूमिका आहे यामुळे अनेक संसार उगडयावर येणार असून या व्यपारांच्या अग्रहसतारावरून रेल्वे उड्डाणंपुलाच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

मी विकासाच्या विरोधात नसून व्यपारी वर्गावर अन्याय होत असेल तर रोड वर उतरून आंदोलन करण्याची माझी भूमिका असेल. या पत्रकार परिषदला उपस्थित, परभणी लोकसभा चे खासदार .संजय जाधव, परभणी जिल्हा परिषद चे माझी सभापती श्रीनिवास मुंढे,मराठा समन्वयक गंगाखेड चे श्रीकांत भोसले,रिपाई चे महावीर राजे भालेराव, शिवसेनेचे विष्णू मुरकुटे, जीवन गोरे, शेंडगे, रमजान भाई खुरेशी नागेश कोणार्डे,इतर व्यपारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here