कुंभमेळा हा केवळ जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा नाही; तो श्रद्धा, भक्ती आणि दैवी संबंधाच्या शोधाचा एक असाधारण संगम आहे. दर बारा वर्षांनी सर्व स्तरातील लाखो यात्रेकरू प्रयागराजला जातात. जिथे गंगा, यमुना आणि गूढ सरस्वती नद्या पवित्र त्रिवेणी संगमावर एकत्र येतात. येथे ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण काळात ते पवित्र स्नानात स्वतःला विसर्जित करतात ज्यावर त्यांचा विश्वास आहे की पापे शुद्ध करण्याची, आत्म्याचे नूतनीकरण करण्याची आणि दैवाशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याची शक्ती आहे. असं असलं तरी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर मानवाच्या प्रवृत्तीत खरच बदल घडतो का? त्याच्या वागण्याबोलण्यात, आचरणात काहीतरी फरक पडतो का? हा चिंतनाचा विषय आहे. एकंदरीत त्याच्यात काहीच फरक न पडल्याचे दिसून येते. म्हणजे जैसे थेच परिस्थिती…
प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) ने ७३ ठिकाणी पाण्याची चाचणी करून अहवाल राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण (एनजीटी) ला सादर केला. प्रयागराज महाकुंभात गंगा-यमुनेच्या संगमावर स्नान सुरू आहे. आतापर्यंत ५४ कोटींहून भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही नद्यांचे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) १७ फेब्रुवारीला राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण (एनजीटी) ला आपला अहवाल सादर केला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९ ते २१ जानेवारी दरम्यान प्रयागराजमधील एकूण ७३ वेगवेगळ्या ठिकाणांहून नमुने गोळा केले. आता त्याच्या चौकशीचे निकाल जाहीर झाले आहेत. गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या नद्यांच्या पाण्याची एकूण ६ पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात आली. यामध्ये पीएच म्हणजे पाणी किती आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी आहे, मल कोलायटिस, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, रासायनिक ऑक्यिजन डिमांड आणि विरघळलेला ऑक्सिजन यांचा समावेश आहे. या ६ पॅरामीटर्सवर ज्या ठिकाणांहून नमुने घेण्यात आले. त्यापैकी बहुतेक ठिकाणी विष्ठेतील कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले. याशिवाय, पाण्याची गुणवत्ता इतर ५ पॅरामीटर्सच्या मानकांनुसार आहे. जिल्ह्यातील सर्व नमुना तपासणी केंद्रावर विष्ठेतील कॉलिफॉर्म बॅक्टेरिया निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहेत.
नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म नावाचा जीवाणू आढळतो. सामान्य परिस्थितीत, १ मिलीलीटर पाण्यात १०० बॅक्टेरिया असावेत. पण अमृत स्नानाच्या फक्त १ दिवस आधी यमुना नदीच्या नमुन्यात फेकल कॉलिफॉर्म २३०० आढळून आले.
संगमच्या आसपासची परिस्थिती आणखीनच वाईट…संगममधून घेतलेल्या नमुन्यात १ मिली पाण्यात १०० ऐवजी २००० विष्ठेतील कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आले. त्याचप्रमाणे एकूण मल कॉलिफॉर्म ४५०० आहे. गंगा वरील शास्त्री पुलावरून घेतलेल्या नमुन्यात मल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया ३२०० आणि एकूण मल कॉलिफॉर्म ४७०० आहेत. संगमापासून दूर असलेल्या भागात दोघांची संख्या कमी आहे. फाफामौ क्रॉसिंगजवळून घेतलेल्या नमुन्यात १ मिलीलीटर पाण्यात १०० ऐवजी ७९० फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले. त्याचप्रमाणे राजापूर मेहदौरीमध्ये ते ९३० असल्याचे आढळून आले. झुसी येथील छतनाग घाट आणि एडीए कॉलनीजवळ त्याची मात्रा ९२० आढळून आली. नैनीतील अरैल घाटाजवळ ते ६८० होते. तर राजापूरमध्ये ते ९४० असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार ते ‘क’ श्रेणीत येते. यामध्ये शुद्धीकरण आणि निर्जंतुकीकरणाशिवाय पाणी आंघोळीसाठी देखील वापरले जाऊ शकत नाही.
मल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे जास्त प्रमाण रोगांना कारणीभूत ठरत असते. बनारस हिंदू विद्यापीठात गंगा नदीवर संशोधन करणारे प्राध्यापक बी.डी.त्रिपाठी म्हणतात की, ज्या पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त मल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया असतात ते पाणी कोणत्याही वापरासाठी योग्य राहणार नाही. जर हे पाणी शरीरात गेले तर त्यामुळे आजार होतात. त्यामुळे अशा पाण्याने आंघोळ केले किंवा प्यायले तर त्वचारोग होऊ शकतो.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या अहवालात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याची एकूण ६ पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात आली आहे. यातील पाण्याचा पीएच किती आहे? त्यात आम्लयुक्त किंवा क्षारीय, मल कॉलिफॉर्म, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, रासायनिक आक्सिजन डिमांड आणि विरघरलेला ऑक्यिजन समाविष्ट आहे. या ६ पॅरामीटर्सवर ज्या ठिकाणांहून नमुने घेण्यात आले. त्यापैकी बहुतेक ठिकाणी विष्ठेतील कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले. याशिवाय पाण्याची गुणवत्ता इतर ५ पॅरामीटर्सच्या मानकांनुसार आहे.
२०१० च्या कुंभमेळ्यातही अशीच परिस्थिती होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात स्पष्टपणे असे सूचित केले आहे की, मोठ्या आंघोळीच्या दिवशीही पाण्याची गुणवत्ता खराब होती. तसेच २०१९ च्या कुंभमेळ्यात १३ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. अहवालानुसार करसर घाटावर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण स्वीकार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळले. आंघोळीच्या प्रमुख दिवशी संध्याकाळपेक्षा सकाळी बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची पातळी लक्षणीयरीत्या जास्त होती.
शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)भ्रमणध्वनी:-७०५७१८५४७९




