Home महाराष्ट्र भामट्यांनो, संत तुकोबारायांच्यावर गुन्हा दाखल करणार काय ?

भामट्यांनो, संत तुकोबारायांच्यावर गुन्हा दाखल करणार काय ?

125

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

  जेष्ठ पत्रकार ‘अभिव्यक्ती’ चे संपादक रविंद्र पोखरकर यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायात मंबाजीच्या औलादींची खुपच गर्दी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वारकरी सांप्रदायात घुसखोरी करत संतानी समतेचा संदेश देत ज्या भागवत धर्माची पताका उंच उंच फडकत ठेवली तिथे आज जातीयवादाचे स्तोम माजवले आहे. या भामट्यांनी संतांचा मुळ भागवत धर्म, मुळ वारकरी सांप्रदाय भ्रष्ट केला आहे. रविंद्र पोखरकर सरांनी ज्या विषयावर भाष्य केले तो विषय बाजूला सोडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ‘अध्यात्माचा बाजार’ केव्हाच मांडला आहे यात नवीन ते काय ? आज या बदमाशांनी अध्यात्माला कार्पोरेट लुक दिला आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेकांची दुकानदारी सध्या भलतीच तेजीत आहे. अनेक किर्तनकारांचे दर, त्यांच्या सुपा-या या गोष्टी न बोलल्याच ब-या आहेत. पाच हजारापासून ते एक लाखापर्यंत एकेकाचे दर आहेत. ते किर्तनातून जे सांगतात ते त्यांच्या आचरणात असतेच असे नाही. आचरणाचा आणि सांगण्याचा काहीही संबंध नसतो. केवळ पाठांतर केलेले, घोकंपट्टी केलेले म्हणायचे. एकपात्री प्रयोग सादर करायचे. ज्याचा जगण्याचा आणि ज्याचा दुरान्वयेही संबंध नाही असे सांगायचे. बाकी त्या एकपात्री प्रयोगाचा बाजार तेजीत आहे. त्यांचा धंदा खुपच तेजीत आहे. त्यांच्या वरकड कमाईचे आम्हाला दु:ख नाही पण संतपरंपरेचा बाजार मांडला आहे त्याची खंत वाटते. संतांनी हयातभर अशा प्रवृत्तींच्याकडून छळ सहन केला. संत तुकोबारायांच्या किर्तन परंपरेचा वारसा असणारे किर्तनकार आज हाताच्या बोटावर मोजण्या इतके उरलेत. आजही या सांप्रदायात काही लोक असे आहेत की त्यांनी सतांचा मुळ विचार जपला आहे. भागवत धर्माचा आत्मा जपला आहे. ते ख-या अर्थाने वारकरी आहेत. द्नानोबा-तुकोबाचे वारस आणि पाईक आहेत. पण अलिकडे या प्रातांत बाजारबुनग्यांची इतकी गर्दी झाली आहे की खरे कोण, खोटे कोण ? हे ओळखणे मुष्किल झाले आहे. 

         किर्तनकारांचा हा बाजार अध्यात्मिक कमी राजकीय आणि अर्थिक उलाढालीचा जास्त आहे. बाजारापेक्षा ‘धंदा’ हा शब्द अधिक योग्य वाटतो आहे. यात अनेक किर्तनकार भामटे आणि भुक्कड आहेत. सगळी व्यसनं करायची, भानगडी करायच्या आणि पुन्हा “राम कृष्ण हरि ।” म्हणत समाजाला चुना लावायचा. वारक-यांचा वेष घातला, माळ घातली, टिळा लावला, टोपी घातली आणि “राम कृष्ण हरि” म्हटले की हे भामटे झाले वारकरी अशी स्थिती आहे.

*ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू । अंगी लावूनीया राख । डोळे झाकूनी करती पाप ।। दावी वैराग्याच्या कळा । भोगी विषयाचा सोहळा ।। तुका म्हणे सांग किती । जळो तयांची संगती ।।*

संत तुकाराम महाराजांनी अशा भामट्यांची संगती नकोच म्हंटले आहे. खरेतर हे चित्र खुपच भयावह आहे. ज्या संतांनी अध्यात्मिक परंपरा अधिक समृध्द केली, सकस केली त्या संताचाच मुळ विचार मारण्याचा हा प्रयत्न आहे. अध्यात्मातला बाजार काही नवा नाही. यावर आम्ही वज्रधारीतून अनेकवेळा लिहीले आहे. आम्हीच काय अनेकानी अनेकवेळा हा विषय मांडला आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराजांनी या बाजाराबद्दल पोटतिडकीने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी किर्तनाला गेल्यावर बिदागी घेणारांचे कान उपटलेत. त्यांनी त्यांच्या अभंगातून या भामट्या व बाजारू प्रवृत्तीवर खुप प्रहार केले आहेत.

जेथे किर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।। बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ।।तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ।।तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ।।

वरील अभंगात जगदगुरू संत तुकोबारायांनी अशा भामट्यांचे काय होते ? ते सांगितले आहे. ते म्हणतात की किर्तन करायला जिथे जाल तिथे अन्न खाऊच नका पण तिथला बुक्कासुध्दा कपाळाला लावू नका. तिथली माळसुध्दा घालू नका. तिथे तुमच्या घोड्याला सुध्दा चारापाणी देऊ नका. जे किर्तन करायला पैसे किंवा बिदागी घेतात आणि जे त्यांना बिदागी देतात ते दोघेही नरकात जातात. इतकं स्पष्ट तुकोबारायांनी सुनावले आहे. पण बदमाशांना याच्याशी काय देणे-घेणे ? त्यांना अध्यात्माच्या नावाखाली बाजारच मांडायचा असतो. जे मुळचेच भामटे आहेत त्यांना संताच्या विचारांशी त्या विचारांच्या इमानाशी काय देणे-घेणे असणार ? तुकोबारायांनी आपल्या अंभगातून अशा भामट्यांची चामडी सोलली आहे पण आजकाल गाथेपेक्षा, तुकोबारायांपेक्षा हे भामटे आणि त्यांचे प्रस्थच मोठे झाले आहे. ज्यांनी रविंद्र पोखरकरांच्यावर गुन्हा दाखल केला त्या भामट्यानी संत तुकोबारायांच्यावरही गुन्हा दाखल करावा. कारण पोखरकर जे बोलले त्या पेक्षा भयंकर पध्दतीने तुकोबारायांनी भाष्य केले आहे. तुकोबारायांनी अभंगातून या बदमाशांना चाबकाने फोडले आहे. खोटे आडनाव लावून अध्यात्मात घुसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिल्लू, मंबाजीचा आधूनिक अवतार तुषार भोसलेचे आज वारकरी सांप्रदायात प्रस्थ झाले आहे. त्याची संघटना तयार झाली आहे. तो भाजपाच्या कार्यकर्ता आहे. असले वारकरी वेष धारण केलेले कित्येक श्वान वारकरी सांप्रदायात संत म्हणून, वारकरी म्हणून वावरत असल्याचे दिसतात. हे लोक संघाचा विचार वारकरी सांप्रदायात रूजवू पाहत आहेत.

भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथे अनुभवाचा काय पंथ ।। वाढवूनी जटा फिरे दाहीदिशा । तरी जंबूवेषा सहजस्थिती ।।

 म्हणजे कुत्रं भगवं दिसत असलं तरी ते संत किंवा साधू नसते. त्याला संत समजू नये. त्याचा तो सहज वेष असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. इथं तर जाणिवपुर्वक भगवं घालून अध्यात्माला नागवं करणारांची खुपच गर्दी आहे. अशा अध्यात्मातल्या श्वानांना आवर घालण्याची गरज आहे. संत तुकारामांचा विचारच या श्वानांना आवर घालू शकतो. पण भाजपेयी राजकारण्यांनी पाळलेल्या या श्वानांना जाणिवपुर्वक वारकरी सांप्रदायात सोडले आहे. ते आपल्या मालकाची सेवा चाकरी करत आहेत. मालकाच्या राजकारणासाठी या बदमाशांनी वारकरी वेष परिधान केला आहे. किर्तनकार घडवणा-या संघाच्या अनेक शाळा आहेत. या शाळामधून संघ विचाराची गुळणी तोंडात धरून आलेले किर्तनकार वारकरी सांप्रदायावरच रोज हल्ले करत आहेत. ज्याचा संबंध नाही ते सगळं सांप्रदायात घुसवले जात आहे. तुकाराम महाराजांनी किर्तन करून पैसे घेणे म्हणजे “कन्या विक्रय” करणे म्हंटले आहे. किर्तनासाठी पैसे घेणे म्हणजे स्वत:च्या मुलीचा सौदा करून पैसे कमावणे होय. कन्या विक्री करणारा, गाय विकणारा आणि हरिकथा विकणारास संत तुकाराम महाराजांनी चांडाळ म्हंटले आहे. अशा चांडाळांची आज वारकरी सांप्रदायात खुपच दाटीवाटी झाली आहे. 

 कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे ।।

याच चांडाळांना राग येवून त्यांनी रविंद्र पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणारे सच्चे वारकरी असूच शकत नाहीत. हे तर मंबाजीचे वारसदार आहेत. असले भामटे द्नानोबा-तुकोबाचे वारस असूच शकत नाहीत. या चांडाळांना अभिव्यक्तीचे संपादक रविंद्र पोखरकर शरण जाणार नाहीत. ते घाबरणारे नाहीत. ते ख-या अर्थाने तुकोबारायांचे वारस आहेत. तुकोबारायांचा सच्चा वारस असल्या भामट्यांना घाबरू शकतो का ? पोखरकर या भामट्यांना पुरून उरतील. या संघी भामट्यांनी सत्तेच्या पदराआड दडत कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी पोखरकर दबणारे नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे इतकेच. बाकी आम्ही पोखरकरांच्यासोबत आहोतच. पोखरकरांच्या सोबत या श्वानांच्या पाठीत काठी घालण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. *आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कंटकांचे शीर ।।* हे तर वज्रधारीचे ब्रीद वाक्यच आहे. तेव्हा या भगवा वेष धारण केलेल्या श्वानांना कोण घाबरतो ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here