बावनकुळेंनी मुद्दाम महसूल खाते मागून घेतले. कारण खरी कमाई तर गृहखाते, महसूल खाते आणि बांधकाम खात्यातून मिळते. या आमदारांनी ही खाती लोकसेवेसाठी नाही तर तगडी कमाई साठी खिशात घातलेली आहेत. हे आता बेवडा आणि सट्टाबहाद्दरला कळते. त्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर बनण्याची गरज नाही.
बावनकुळे महसूल मंत्री झाल्यानंतर मंत्री पदाचे तीन लाख मानधन घेतात. तरीही……..महसूल खात्याचे काम न करता पक्षाचे काम करीत आहेत. केले जळगावला. तर मग यांचे त्या दिवसाचे मानधन कापून घेतले पाहिजे. काम न करता मानधन घेणे हरामखोरी असते.
महसूल आणि भुमि अभिलेख खात्यातील शेतकऱ्यांची प्रशासकीय कामे होत नाहीत. शेतकरी तक्रार करतात. कोणीही दखल घेत नाहीत. यावर बावनकुळे चकार शब्द बोलले नाहीत. यांना ती जाणिवच झाली नाही. बधीर ,बहिरे, आंधळे आहेत का?
बावनकुळे नावाचा मंत्री जळगावला येऊन काय केले? म्हणे, वाळूबाबत कडक धोरण पाहिजे. का पाहिजे? वसुली जास्त पाहिजे. कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये नवीन पो. नि. येतो, तेंव्हा तो सुद्धा बावनकुळे सारखाच सिंघम ची भाषा बोलतो. “ए,सब गलत धंदे बंद. “म्हणजे मला वसुली वाढवून पाहिजे. हा इशारा अवैध धंदेवाईक बरोबर ओळखतात. हप्ता वाढवून देतात. तसाच प्रकार बावनकुळे बाबतीत वाटतो. मला वाळूचे कडक धोरण राबवायचे आहे. तहसिलदार, प्रांताधिकारी, कलेक्टर समजले कि, यांना वसुली वाढवून पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामे वाळू वाचून खोळंबली आहेत. हे यांना कोणी चमच्याने सांगितले नाही का?
या माणसाने जळगाव ला येऊन फक्त भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यांना शेतकऱ्यांच्या समस्या बाबत काहीच देणेघेणे नाही. सोयरसुतक नाही. संवेदना नाही. बधीर, बहिरे, आंधळे आहेत का?
माणूस एकदाचा मंत्री बनला कि, समजतो कि, ही खनिज संपत्ती त्याच्याच बापाची आहे. तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी कलेक्टर हे जसे त्यांचे खाजगी नोकरच आहेत. अशा आविर्भावात वावरतात.
बावनकुळेंना कधी जाणिव झाली नाही. कधी होणारच नाही कि मी महसूल खात्याचा मंत्री आहे. महसूल संबंधी नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. फडणवीस किंवा महाजन हे सांगणारच नाहीत. हे भो, जळगावला आले तर थोडे इमानदारीने महसूल खात्याचे काम करा. असे सांगण्याची जबाबदारी मी घेतो. बावनकुळेंना मुंडे आणि धस यांच्या लफड्यातून वेळ मिळाला तर फुरसत काढून जळगाव ला यावे. शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडतो. आमनेसामने. बघू, यांच्या बडबडीत किती कळकळ असते!
बावनकुळेंनी शेतकरी बाबत थोडेतरी संवेदनशीलता दाखवली असती तर माननीय, सन्माननिय, महोदय, नामदार म्हटले असते. पण तशी गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलीच नाही. म्हणून असा कोणताही मान सन्मान घेण्यास पात्र नाहीत. लायक नाहीत.
माझा लेख वाचल्यानंतर भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांना वाटेल कि, मंत्री आहेत तर मंत्रीपदाला शोभेल असा मान दिला पाहिजे. मी पण तेच म्हणतो, मंत्री पदाला शोभेल असे काम तर केले पाहिजे.
शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२




