Home चंद्रपूर स्त्रियांचे भावविश्व उलगडणारे लेखन यायला हवे – अँड. गोस्वामी

स्त्रियांचे भावविश्व उलगडणारे लेखन यायला हवे – अँड. गोस्वामी

110

▪️नक्षत्रांच देणं काव्यमंचच्या कवितेचे कॅलेंडर चे प्रकाशन 

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16फेब्रुवारी):-आज अनेक स्त्रिया कविता लेखन करतात, पण इतर वाड्.मय प्रकाराची निर्मिती करणाऱ्या स्त्री लेखिका कमी आहे. त्यातही आत्मचरित्र हे प्रत्यक्षात स्त्रीनेच लिहिले पाहिजे कारण, आत्मचरित्रातून स्त्री मनाचा इतिहास आणि बदलत्या समाजस्थितीचा प्रवास उलगडत जातो अर्थात आत्मचरित्र हे स्त्रियांचे भावविश्व उलगडणारे असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका तथा समाजसेविका अँड. पारोमिता गोस्वामी यांनी केले . झाडीबोली साहित्य मंडळ नक्षत्राचं देणं काव्यमंच जिल्हा शाखा चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने शास्त्रीनगर येथे आयोजित ‘कवी हा जगताचा धनी’ या कवितांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

       अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अँड. डॉ. कल्याणकुमार, कवयित्री रोहिणी मंगरूळकर उपस्थित होत्या.

          डॉ. कल्याणकुमार यांनी मानवात सर्जनशीलता असतेच. त्या सर्जनशीलतेला संस्कारित करणे आवश्यक आहे. राष्ट्रसंतांची सर्जनशीलता ही संस्कारित होती म्हणूनच त्यांच्या हातून दर्जेदार लेखन झाले. आपणही राष्ट्रसंताची प्रेरणा घेऊन लेखन करावे व साहित्याची निर्मिती करावी. जेणेकरून समाज समृद्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली साहित्य मंडळ आणि नक्षत्रांच देणं काव्यमंचच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि कवितेच्या कॅलेंडर मध्ये निवड कवींचे अभिनंदन केले.मोठे योगदान आहे.

            या कार्यक्रमात कवयित्री मंजूषा खानेकर , रोहिणी मंगरूळकर आणि विद्या भदाडे यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन करून आपली साहित्यिक वाटचाल कथन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडीबोली सहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव डॉ. धर्मा गावंडे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here