Home महाराष्ट्र बावनकुळेंना कामाला लावा!

बावनकुळेंना कामाला लावा!

340

महसूल मंत्री बावनकुळे आता जामनेर ला येणार आहेत. सोबत मुख्यमंत्री फडणवीस पण येणार आहेत. कशासाठी? काही भजन किर्तन, तमाशा, प्रवचन करणार आहात का? जर बावनकुळेंनी महसूल खाते रूसून फुगून मागून घेतले तर जबाबदारीने काम केले पाहिजे. मंत्री बनल्यानंतर शासकीय, प्रशासकीय जबाबदारी असते. म्हणूनच दोन अडीच लाख दरमहा मानधन दिले जाते. मानधन हा तुमचा अधिकार नाही. तो आहे कामाचा मोबदला. तुम्हाला खाजगी धंदा करायला वेळ मिळत नाही म्हणून हे कम्पेसेशन दिले जाते. दरमहा तिजोरीतून पैसा घेता तर कामे करा. आता राजकीय कामापेक्षा शासकीय, प्रशासकीय कामांकडे लक्ष दिले पाहिजे.

      फक्त जामनेर तालुका नव्हे पुर्ण जळगाव जिल्ह्यातील महसूल संबंधित शेतकऱ्यांची, नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. चकरा मारूनही कामे करीत नाहीत. आता ही जबाबदारी बावनकुळेंची आहे, का कामे करीत नाहीत?

    जळगाव जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना, नागरिकांना आम्ही सुचवतो कि बावनकुळे आणि फडणवीस जामनेर येथे येण्याआधी तुमचे अर्ज, तक्रारी तुमच्या तालुका आणि जिल्हा स्तरावर दाखल करा. त्याची एक प्रत महाराष्ट्र जागृत जनमंच कडे सोपवा.आधी तर वाटसअप वर टाका. एक प्रत समक्ष येऊन द्या. जर विषय जास्त कठीण असेल तर चर्चा करा. जेणेकरून आम्ही हे अर्ज आणि तक्रारी बावनकुळे कडे सादर करू.

     अर्ज आणि तक्रारी जमा झाल्यानंतर आपण एक सार्वजनिक पत्रकार परिषद घेणार आहोत. त्यात प्रत्येक अर्ज आणि तक्रारीची जाहीर वाच्यता करणार आहोत. जेणेकरून संबंधित नोकर त्याचा निपटारा करतील. मंत्र्यांची भेटीनंतर काम करु, असे सांगणारा नोकर नालायक असतो. कारण कायद्याच्या चौकटीतील कामे निर्धारित वेळेत करणे ती त्यांची जबाबदारी असते. कोणत्याही नोकरांना फुकट पगार दिला जात नाही.

         शेतकऱ्यांनो, नागरिकांनो आता निवडणुका संपलेल्या आहेत. आमदार कडून मतांचे पैसे मिळाले. ते आतापर्यंत संपले असतील. त्यामुळे कोणत्याही मतदारांनी आमदारांचे दडपण मनावर ठेवू नये.

    बावनकुळे यांनी जर महसूल खात्यातील कामांचा निपटारा केला तर ते तुमच्या वर उपकार करीत नाहीत. त्यासाठी तुमच्या करातून जमा झालेल्या निधीतून तगडे मानधन त्यांना दिले जाते. शिवाय या मंत्र्यांनी उमेदवारी अर्ज स्वत भरला. दहा वीस कोटी खर्च केले. मतदारांना वाकून नमस्कार केला. पैसे पण दिले. म्हणून तुम्ही मतदान करून निवडून दिले. यांनी रूसून फुगून, नखरे करून मंत्रीपद मिळवले. कशासाठी? हिच तर कामे करण्यासाठी. तेच तर आपण बावनकुळेंना कामाला लावत आहोत.

     अर्ज आणि तक्रारीची तोंडी तोंडी चर्चा करून वेळ वाया घालवू नका. आवश्यक कागदपत्रे व सपोर्टींग जी आर सहित आमच्या कडे द्या.

    अशी प्रकरणे एकत्रित करून आम्ही आधी पत्रकार परिषदेत याचा उहापोह करू. जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांना कळले पाहिजे कि आपले नोकर कामचोरी करीत आहेत. सरकार पक्षातील पदाधिकाऱ्यांना कळले पाहिजे कि आपले मंत्री कामे करीत नाहीत.

    जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक कामे महसूलची खोळंबली आहेत. जास्त कामे आहेत म्हणून नव्हे तर लांच मिळेल या आशेने. जामनेर तालुक्यातील महसूल आणि भुमिअभिलेख ची कामे जास्त प्रलंबित आहेत. गिरीश महाजन याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून आम्ही बावनकुळे आणि फडणवीस यांचे लक्ष वेधून घेत आहोत.

      नागरिकांनो, निवडणूक झाली. मताचे पैसे मिळालेत. ते आता दारू, मटण, बीडी काडी मधे संपले असतील. त्यामुळे ते दडपण मनावर ठेवू नका.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here