अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.9फेब्रुवारी):- आज च्या परिस्थितीत भारतातील सर्व महिलावर्ग आज पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जीवनाचा गाडा ओढत आहेत.मी आज परिस्थितीला तहसीलदार म्हणून जॉईन झाले याचे सर्व श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवेद्य पत्नी रमाई आंबेडकर यांना जाते यात तीळ मात्र शंका नाही.भारतीय बौद्ध महासभा आयोजित कार्यक्रमात डॉ.बाबासाहेबआंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या समोर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पंडितराव पारवे यांची उपस्थिती रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने प्रमुख व्याख्याते म्हणून जेष्ठ कवी प्रा.प्रकाश मोगले,पुणे येथील माजी शिक्षण संचालक नंदन नागरे,तहसीलदार उषा किरण शिंगारे,नायब तहसीलदार सुनील कांबळे,प्रीतमकुमार नोडल, बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे,इत्यादींची प्रमुख उपस्थिती होते.तहसीलदार मॅडम आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी त्यांनी ,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्या यांच्या जीवनावर बोलत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली होऊन रमाईने दुःखाचा डोंगर पचवून गंगाधर, रमेश, राजरत्न व मुलगी या चौघांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना मुलांच्या आजारा वरील औषध नसल्या मुळे चारही मुलांचा मृत्यू व्हावा. हे आपणास माहीत असायला हवे.बाबासाहेबांची सावली होऊन माता रमाईने जीवना अवघे 32 वर्षात 1935 रोजी मृत्यूला कवटाळले त्यामुळे आजच्या महिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी जास्त मेहनत घेऊन मुलांचं भविष्य उज्वल करावे.रमाई जयंती कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले या प्रसंगी महिलांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान शेवट पर्यंत प्रबोधन कार्यक्रम ऐकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ साळवे यांनी केले तर आभार जोंधळे यांनी व्यक्त केले.




