Home महाराष्ट्र स्वयंशिस्त ठेवून यशवंत व्हा-मा. श्री. आदिनाथ खरात 

स्वयंशिस्त ठेवून यशवंत व्हा-मा. श्री. आदिनाथ खरात 

103

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.7फेब्रुवारी):-“राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन एस एस) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून युवकांचा व समाजाचा विकास होतो. लोकांमध्ये गेल्याशिवाय, समाजामध्ये वावरल्याशिवाय शहाणपण येत नाही. विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त ठेवून आपले ध्येय प्राप्त करावे. स्वयंसेवकांनी स्वयंपूर्ण व्हायला हवे. एन एस एस शिबिरामुळे स्वयंविकास होतो व सकारात्मक विचाराने माणूस पुढे जातो. स्वयंसेवकांनी थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. माणसं समजण्यासाठी एकत्र यावे लागते. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे अमृत कुंभ आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

‘एनएसएस’च्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढतो आणि संस्काराची शोदोरी आयुष्यभर पुरते.”, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे माननीय श्री. आदिनाथ खरात (API, पोलीस स्टेशन, मसूर) यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

            राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराच्या समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. लालासाहेब पाटील (संचालक,सह्याद्री सहकारी साखर कारखाना, लि. यशवंतनगर) म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमाचे मुल्य शिकविणारी आणि संस्कार घडविणारी शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी शाखा असून स्वयंसेवक स्वंयस्फुर्तीने सहभागी होऊन कामे करतात आणि लोकांना श्रमाचे महत्व पटवून देतात. पुढील काळात आपण अथक परिश्रम घेऊन यशवंत व्हावे.”

        या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्री. अरुण (काका) पाटील (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, कराड), मा. श्रीमती संगिता साळुंखे (माई) (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), मा. श्री. प्रदीप काशीद (सरपंच, ग्रामपंचायत, किवळ) मा. श्री. कैलास साळुंखे (उपसरपंच, किवळ), मा. श्री रामराम साळुंखे (सचिव देवस्थान समिती), मा. श्री. वैभव पुजारी (पोलीस पाटील)  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

       मा. सौ. संगिता साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, स्वयंसेवक कु. शाहीन शेख व कु. जितेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

    सदर शिबिरात सौ.मनीषा साळुंखे, सौ. प्रांजली साळुंखे, सौ.राजश्री साळुंखे, सौ. सुरेखा साळुंखे, सौ.अर्चना साळुंखे, सौ. रेखा घाडगे, सौ.विना कुलकर्णी, सौ. इंदुमती घाडगे, सौ.विमल जाधव, सौ.छाया साळुंखे, सौ.रत्ना साळुंखे, सौ.सुरेखा साळुंखे, कु.समिक्षा साळुंखे, कु.नजमीन मुलाणी, कु.गिरीजा कुलकर्णी व कु. प्रज्ञा वाघमारे यांचा विविध स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मा. सौ. संगिता साळुंखे (माई) (केंद्रीय दिशा समिती, नई दिल्ली, कु. प्रिती धनाजी कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

            मा. सौ. संगिता साळुंखे (सदस्या, केंद्रीय दिशा समिती, नई दिल्ली) मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “सर्व स्वयंसेवकांनी सूर्यासारखे तेजस्वी व्हावे. समाजाप्रती आपली बांधिलकी जोपासून नवीन कौशल्ये अवगत करावी. खूप खूप मोठे व्हा. त्यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.”

         कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने झाली. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक वेणूताई चव्हाण कॉलेजचे मा. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांनी केले. शिबिराचे अहवाल वाचन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमूख पाहुण्यांचा परिचय डॉ. डी. पी. जाधव यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एन. ए. पाटील यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीमती. एस. एम. चव्हाण व प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे यांनी केले. या शिबिराच्या समारोप समारंभास समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक तसेच मौजे किवळ येथील उपसरपंच मा. कैलास साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here