Home महाराष्ट्र संविधान म्हणजे लोकशाहीचा आत्मा – डॉ. महेंद्र खैरनार 

संविधान म्हणजे लोकशाहीचा आत्मा – डॉ. महेंद्र खैरनार 

96

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 कराड(दि.3फेब्रुवारी):- “संविधानाने भारतीय नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, आणि नेतृत्वाचे मुल्य दिले आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, जसे की व्यक्तिस्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, धार्मिक स्वतंत्रता आणि समानतेचा अधिकार. संविधानाचा उद्देश, भारतीय संविधानाची महत्ता आणि त्यातील मुल्ये लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला कर्तव्ये देखील आहेत. आपण आपल्या कर्तव्यासंबंधी जागरूक होऊन आपल्या संविधानाचे पालन करूया. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे आणि कर्तव्यातील समतोल राखणे, हे आपले मूलभूत दायित्व आहे. संविधान हे भारतीय एकतेचा आणि लोकशाहीचा आत्मा आहे.” असे प्रतिपादन मा. डॉ. महेंद्र खैरनार यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात चला संविधान समजून घेऊया या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

          सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. विश्वास दादासो साळुंके म्हणाले की, “भारतीय संविधान केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही, तर तो देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श आहे. भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन संविधानाने दिला असून प्रत्येक घटकासाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या. संविधानामुळेच भारतातील विविधता एकत्र ठेवणे, सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करणे, आणि सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून देणे शक्य झाले आहे.”

       सदर कार्यक्रमास मा. सौ. संगिता साळुंखे (माई), (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. डॉ. एन. ए. पाटील, श्री प्रदीप काशीद (सरपंच), मा. श्री. कैलास साळुंखे (उपसरपंच), सौ. सुवर्णा साळुंखे, श्री शिवाजी मुळीक, श्री. शिवाजी साळुंखे, सौ. रंजना साळुंखे, श्री हिंदुराव साळुंखे, श्री काकासो साळुंखे, श्री. विजू पवार  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या सुरवातीला शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. कराडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रांजल कांबळे याने करून दिला. तर आभार साहिल पाटील याने मानले. सूत्रसंचालन कुशान भोसले याने केले. या समारंभास मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा.डॉ. श्रीमती एस. एम. चव्हाण, प्रा. श्रीमती मोरे, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here