Home चंद्रपूर कवी अंगुलिमाल उराडे समाजसेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

कवी अंगुलिमाल उराडे समाजसेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

83

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28जानेवारी):- साहित्यरंग साहित्य मंच नाशिक आयोजित कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, मानस सेवा केंद्र, मायको हॉल सिडको नवे नाशिक येथे मोठा उत्साहात पुरस्कार सोहळा व कवी संमेलन पार पडले. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी कविवर्य अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन साहित्यरंग साहित्य मंच नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे दोन सत्रामध्ये विभागणी करण्यात आली होती. पहिल्या सत्रात निमंत्रित कवींचे कवी संमेलन पार पडले. तर दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. रविकांत शार्दुल होते, तर स्वागताध्यक्षपदी नाशिक चे ज्येष्ठ कवी मा. सुभाष उमरकर होते. तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका मा. सौ. इंदिरा जाधव जळगाव, प्रमुख पाहुणे मा. हर्षवर्धन संजय सोनवणे, मा . सुहास टिपरे, युवा उपस्थिती मा. अश्विनी सांगळे, युवा कवी वक्ते व्याख्याते सुशीलकुमार देवराव शिंदे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा च्या लेखिका मा. सौ. नयना अजयराव देशमुख लिखित “आई तुझी सावली” ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आणि त्यानंतर पार पडलेल्या कवी संमेलनामध्ये मा. स्वाती सोनवणे, मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे, कु. कावेरी मदने, मा. प्रशांत दामले, नागोराव सोनकुसरे, कु. कांचन दांडेकर, शब्दस्वरा मंगरुळकर, डॉ. प्रदीपकुमार कळसकर, चंद्रकला अमृतकर, कुशल दुसाने, राज ठाकूर, रत्नेश चौधरी, प्रतिमा चौरे, नयना देशमुख, अर्चना राहुरकर, रेखा पेटारे, अण्णासाहेब बडाख, रविंद्र पाटील, मनीष आहेर, सुहास टिपरे, किरण तायडे, वैशाली सोनवणे, साहेबराव पवार, विजय शिंदे, कविता झावरे, सारीका ताजणे, गणेश वसावे, अर्चना परदेशी, कृष्णा गवळी, गझलकार यशवंत पगारे, सुर्यभान पेटारे, अपुर्वा कापडणीस, वाळू आहेर, संदिप पगारे, नामदेव हुले, आशा विरारी, रंजन कापडणीस इ कवी कवयित्रींनी सहभाग घेऊन उपस्थित काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. विजय शिंदे पाटील यांनी उत्कृष्ट असं सुत्रसंचालन केलं.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 व्यक्तींना समाज सेवा सन्मान, साहित्यरत्न सन्मान, नारी रत्न असे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

भावी वकील मा. सुशीलकुमार कुमार शिंदे यांनी अथक परिश्रम घेऊन ह्या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे केले. आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्याविषयी आपुलकीची भावना तितकीच प्रबळ जाणवली. कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत नियोजनबध्द झाले. अगदी खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात पार पडले.

सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र तथा युवा लेखक/कवी कु. अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार मिळाल्याचे समजताच गावातील नागरिक, मित्र मंडळी व आप्तेष्टांकडून त्यांचे भरभरुन कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here