कवठेमहांकाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कवठेमहांकाळ(दि.27जानेवारी):-मोजे कुकटोळी येथील सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचे गट नंबर 697/अ मिळकती मधील ग्रामपंचायत कुकटोळी व पंचायत समिती कवठेमहांकाळ यांनी दोघांनी मिळून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांची संमती न घेता त्यांचे शेतामधील माती उचलून, खड्डे निर्माण करून, जमिनीचे नाशधुस करून, बांधाची मोडतोड केल्यामुळे, सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांनी कवठेमहांकाळ येथील दिवानी कोर्टात दिनांक 22 जून 2011 रोजी रे.दी मु नंबर 63/2011 चा दावा निरंतर ताकिदी साठी दाखल केला होता.
सदर दाव्याचे समन्स मिळूनही ग्रामपंचायत कुकटोळी मे. कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यामुळे मे. कोर्टाने हुकूम करून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकीद दिलेली होती, तरी दाव्याचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत कुकटोळी यांनी पुन्हा दिनांक 23 नोव्हेंबर 2018 रोजी सुनंदा सुतार यांचे जमिनीमधील पुन्हा माती उचलून जमिनीचे नाशदूष करून बांधाचे मोडतोड केली. त्यामुळे सुनंदा सुतार यांनी मे.कोर्टात दरखास्त दाखल करून झालेल्या नुकसानी बाबत ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलीफ मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता.
सुतार यांनी सादर केलेला अर्ज कवठेमहांकाळ येथील दिवाणी मे. कोर्टानी मंजूर केलेला आहे व ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलीफ मार्फत जप्त करण्याचा आदेश दिलेले आहे.या प्रकरणी कवठेमहांकाळ येथील दिवाणी न्यायालयातील अँड . विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिले.




