अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.7जानेवारी):-सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कथा व काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून स्पर्धेसाठी 1000 शब्दापर्यंत स्वलिखित,अप्रकाशित कथा तसेच आपल्या दोन कविता पाठवाव्यात असे आवाहन स्पर्धा प्रमुख स्वाती ठूबे व सुरेखा घोलप यांनी केले आहे.
फेब्रुवारी मध्ये अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलना यामध्ये नवोदितांना सामावून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कथा व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट कवींना संमेलनामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या कथा किँवा स्वरचित दोन कविता, परिचय,फोटो व पोस्टाची रुपये पाचची पाच तिकिटे शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर 41 40 03 या पत्त्यावर पाठवावें,असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व संमेलनात सहभाग असे पारितोषिकाचे स्वरूप राहणार असून नवोदितांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन उपाध्यक्षा जयश्री झरेकर, कार्यवाह भारत गाडेकर, सहकार्यवाह प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे,शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 99 21 00 97 50 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.




