Home Breaking News ” फुले दांम्पत्यांच्या शैक्षणिक चळवळीमुळे बहुजन समाजात क्रांती घडली.” – प्रा.अरुण बुंदेले...

” फुले दांम्पत्यांच्या शैक्षणिक चळवळीमुळे बहुजन समाजात क्रांती घडली.” – प्रा.अरुण बुंदेले ” फुले दांम्पत्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात स्थापन केलेल्या मुलीच्या पहिल्या शाळेचा १७७ वा वर्धापनदिन संपन्न “

110

 

अमरावती- (प्रतिनिधी )
महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दि.१जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली त्याचा १७७ वा वर्धापनदिन फुले दांम्पत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
हा वर्धापनदिन स्थानिक महात्मा फुले पुर्णाकृती पुतळा चौक येथे दि.१ जानेवारी
२०२५ रोजी वऱ्हाड विकास, उपेक्षित समाज महासंघ, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान व सर्वशाखीय माळी समाज महासंघ तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीतील समता सैनिकांच्या वतीने ‘फुले दांम्पत्य सन्मान दिवस साजरा करण्यात आला.
महासंघाने अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड है अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी
समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले,सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई आवारे होत्या.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमांना हारार्पण व पुष्पार्पण करून अभिवादन केले .

बॉक्स

” फुले दाम्पत्यांच्या पहिल्या शाळेपासून भारतीय महिलांना दास्य मुक्तीची सनद मिळाली.”
– समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी,” फुले दांम्पत्यांच्या पहिल्या शाळे- पासून भारतीय महिलांना दास्यमुक्तीची सनद मिळाली. स्त्रिया शिक्षित झाल्या तरच त्या वैचारिक गुलामगिरीतून बाहेर येतील.त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल, हे अनुभवले आणि विषमताधिष्ठित मनुवादी
कायद्याविरुद्ध बंड केले.”असे विचार व्यक्त केले.

प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी “क्रांतिज्योती” या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

बॉवस

आपल्या भाषणात प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले म्हणाले की,” स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य,अधिकार मिळवून देण्यासाठी फुले दांम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.स्त्रियांना साक्षरस्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी दि.1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली.त्याला आज 177 वर्षे होत आहेत. या 177 व्या वर्धापनदिनी फुले दांपत्यांना सलाम.शाळा स्थापन केल्यापासून त्यांच्या शैक्षणिक चळवळीला सुरुवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्वीकारलेले हे आव्हान भयंकर कठीण होते.फुले दांम्पत्यांच्या या शैक्षणिक चळवळीमुळे बहुजन समाजात क्रांती घडून आली. स्त्रियांच्या शिक्षणामागील उद्देश केवळ वाचनापुरताच नव्हता तर तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,पितृसत्ताक पद्धतीला आव्हान देणे हा सुद्धा होता.”असे विचार व्यक्त केले .
याप्रसंगी वृक्षमित्र श्री.प्रवीण वासनिक,सर्व शाखीय माळी समज ऋणानुबंधचे वसंतराव भडके,प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होमगार्ड राजेंद्र शहाकार, परमानंद रामटेके,सचिन गुप्ता, रूपेश पांडे,मनोज तिजारे यांनी समायोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी सावित्रीच्या लेकी कु. कुंजल निलेश म्हसकर, कु. मैथिली बनकर, कु.चंचल शेंडे, कु.इशिदा नागरीकर, कु.वैष्णवी शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन श्री प्रवीण वासनिक तर श्री.गोविंद फसाटे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील समता सैनिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here