रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
चंद्रपुर(दि.2जानेवारी):-भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघीतले जाते. अजुनही शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करीत आहे. त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो. हि वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात बघायला मिळतो. अशी प्रतिक्रिया साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे यांनी व्यक्त केली.
विदर्भातील ४० पत्रकारांनी जळगाव येथील जैन हिल्स येथे सुरु असलेल्या कृषी महोत्सवात दोन दिवस सहभाग घेतला, कृषी प्रदर्शनातून परत आल्यावर सुरेश डांगे हे प्रस्तुत प्रतिनिधीसोबत चर्चा करतांना बोलत होते.
शेतीला तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. हायटेक शेतीचा मुलमंत्र देणाऱ्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने भेट दिली पाहीजे असे आवाहन साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक तथा कष्टकरी जनआंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांनी केले.
सौर कृषी पंप, वेगवेगळ्या माध्यमातुन वातावरणाला अनुरुप पाईप, ठिंबक तंत्रज्ञान, पाणी निचरा करण्याची पध्दती, फळबाग लागवड पध्दत, कमी जागेत अधिक उत्पन्न देणारी अतिसघन आंबा लागवड पध्दत, त्याचबरोबर हळद, आले, लसुण, कांदा, मिरची या मसाल्यांच्या पिकांसह टॉम्याटो, बटाटा, पपई, केळी, डाळींब, जैन स्विट ऑरेज, संत्रा, पेरु, सिताफळ, लिंबु या फळबागाचे प्रात्याक्षिक येथे पहायला मिळाले. ठिंबक व स्प्रिंकलरच्या वापरातुन शाश्वत निर्यातक्षम उत्पादनाचा प्रयोग येथे पाहता येतो. हे फक्त प्रयोग नसुन ते शेतकऱ्यांसह भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर घेवुन जाण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यात आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, बी. संदेश, प्रविण नन्नेवार, तुकाराम लुटे, राजु कापसे, प्रा. राजु रामटेके, रामदास हेमके, नितीन पाटील, संजय नागदेवते, सुरेंद्र बिरामवार, दिलीप घोडमारे, रवी खाडे, संजय वालके, अनिल नौकस्कर, दिलीप नवडेटी, दयालनाथ मानवटे, राम वाडीभस्मे, दिलीपकुमार इंगोले, हर्षपाल मेश्राम, पंकज चौधरी, सुगत गजभीये, शेखर गजभीये, कैलास निगोट, राजकिशोर गुप्ता, धनगोपाल मुझबेले, सचिन टेंगरे, नितीन येरुणकर, लेकराम इंगे, कपील वानखेडे, पवन वानखेडे, व्ही. पदमाकर, वीलास उके, प्लॅश गजभीये, नाना केने आदिचा समावेश होता अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली.




