Home महाराष्ट्र गंगाखेडच्या अन्नपूर्णेला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

गंगाखेडच्या अन्नपूर्णेला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

229

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.29डिसेंबर):-शहरातील मागील 40 वर्षापासून घरगुती मेस चालवणाऱ्या व प्रत्येकाच्या तोंडी ताई, मावशी, आत्या असलेल्या राधाबाई हनुमानदास भंडारी ज्या गंगाखेड शहर व परिसरात साक्षात अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जात त्यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दिनांक 28 डिसेंबर रोजी निधन झाले.

शहरांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने येणारे विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने येणारे कर्मचारी, बँकेतील कर्मचारी या एक ना अशा कितीतरी जणांना आपल्या हातचे चविष्ट, रुचकर जेवण आत्मीयतेने जेवु घालणाऱ्या राधा मावशी यांच्या जाण्याने शहर व परिसरात शोककळा पसरली.

दर एकादशीला फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणे व प्रत्येक दिवाळीमध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या शेगाव या ठिकाणी त्या जात असत .अत्यंत शांत, संयमी, आध्यात्मिक, मायाळू अशी ओळख असलेल्या या राधा मावशींना गंगाखेड शहर व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने गोदा काठावरील स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here