सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8208946716
चिमूर(दि.26डिसेंबर):-परभणी येथील आंबेडकरी बौद्ध लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व अन्य मागण्यासाठी चिमूर तहसील कार्यालयावर भन्ते ज्ञानज्योती महाथेरो व भिक्षु संघाचे नेतृत्वातील जनआक्रोश मोर्चात शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला.
चिमूर येथील तक्षशिला बुद्ध विहारापासून निघालेल्या मोर्चात शासनाचे विरोधात विविध घोषणा व महापुरुषांचा जयघोष करत शेकडो नागरिक सहभागी झालेत. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
देशात आराजकता माजविण्यासाठी शासन संभाजी भिडे सारख्यांना पाठबळ व प्रोत्साहन देत आहे, जातीय दंगली व भेदाभेद निर्माण करण्यासाठी मनुवादी शासन व प्रशासन कार्यरत आहे, यावर आपण शांत डोक्याने विचार करून रणनीती आखावी, मैत्रीभाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावा अशा आशयचे वक्तव्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले.
दरम्यान शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात परभणी येथील आंबेडकरी बौद्ध लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात दोषी पोलिसांवर फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डा. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर अपमानित करणारे भाष्य केले, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून आंबेडकरी जनतेची माफी मागावी, चिमूर तालुक्यातील गदगाव येथील पंचशील झेंड्याचा वाद काही मनुवादी लोकांनी वाद निर्माण केला, या प्रकरणात बौद्ध समाजाला संरक्षण देण्यात यावे आदी विविध मागाण्यांचा समावेश आहे.
दरम्यान अनमोल शेंडे, रोशन ढोक, शुभम मंडपे, रामटेके व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.मोर्चाचे नियोजन किशोर अंबादे, विलास शंभरकर, उद्धव डेकाटे, नेपचंद बारसागडे, रोशन ढोक, सिद्धार्थ चहांदे, अमोल शंभरकर, गौतम पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी केले.




