अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड:- सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निराधार, अपंग, विधवा, परितक्ता यांना शासनाच्या वतीने अल्प स्वरूपात मानधन मंजुरी केली जाते अंतिम मंजुरी करीत असताना खरंच अर्जदार गरीब आहेत का,याची छाननी करून तहसील कार्यालय अंतर्गत पात्र-अपात्र यादी मंजूर करण्यात येते.सर्व निराधार लाभार्थ्यांना निवडणुकी नंतर यादी मंजूर झाली किंवा नाही या साठी लाभार्थी यादी पाहण्यासाठी तहसील कार्यामध्ये येतात परंतु पात्र/अपात्र यादी नोटीस बोर्डावर न लावल्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या अडचणी लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षाचे भाई गोपीनाथ भोसले, गौर सेना संघटनेचे प्रा. नीलकांत जाधव, कॉम्रेडचे योगेश फड, अंतराम भिसे, मारोतराव भिसे यांनी निवेदन देऊन तहसील समोर सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन केले.
सत्याग्रहाची निवेदन देत असताना सत्याग्रह सहभागी झालेल्या वयोवृद्ध निराधार पुरुष/महिला यांनी तहसीलदार जागेवर नसल्यामुळे तहसील कार्यालया मध्येच बैठा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करत अर्धा तास बैठा सत्याग्रह करत असताना काही वेळातच तहसील बाहेर असलेलेतहसीलदार यांनी तहसील मध्ये येऊन निवेदन स्वीकारले.
गंगाखेड तहसील अंतर्गत तलाठी यांच्याकडे असलेली मंजुरी यादी लावत असताना लाडली बहीण, नोकरदार कुटुंब, श्रीमंत कुटुंबांचे सुद्धा नाव आहेत त्यामुळे निराधार गरजवंत महिला मानधनापासून वंचित राहू नये यासाठी सत्याग्रह आंदोलन सुरूच असणार असल्याचे भाई गोपीनाथ भोसले यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
गरजूवंतां शेतकरी कमी उत्पन्न असलेले कुटुंबांना सुद्धा मानधनाचा लाभ देण्यात यावा, निराधार पगारासाठी लागलेली जाचक अट रद्द करण्यात यावी, 21 हजार चे उत्पन्न देऊनही मंजुरी केली नाही त्यांची मंजूर देण्यात यावी, अपंग कॅन्सरग्रस्तांना ताबडतोब मानधन देण्यात यावे इत्यादी मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू असून प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी अन्यथा सत्याग्रह आंदोलन सुरूच राहील असे निवेदनावर म्हटले आहे.




