Home महाराष्ट्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचे पैसे तत्काळ वाटप करा. शासन...

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचे पैसे तत्काळ वाटप करा. शासन व विमा कंपनीला धारेवर धरण्यासाठी ३ जानेवारीला चक्काजाम आंदोलन.

168

 

(मोर्शी तालुका प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२२ – २३ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी मोर्शी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन शासनाला व विमा कंपनीला निवेदन देऊन फळ पीक विमा मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून 3 जानेवारी रोजी हिवरखेड येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा शासन व रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला देण्यात आला.
सन 2022-23 चा पंतप्रधान फळ पिक विमा योजने अंतर्गत काढलेल्या संत्रा फळ पीक विम्याचा परतावा संपूर्ण व्याजासह तत्काळ मिळावा, हिवरखेड अंबाडा महसूल मंडळामध्ये दोन ट्रिगर लागल्याचे शासनाने मान्य केले असून तसा आदेश सुद्धा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला दिला असून सदर विमा कंपनी अमरावती जिल्ह्यातील 2 हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तसेच मोर्शी तालुक्यातील शेतक-यांना गारपीट अनुदानातून वगळण्या आलेले आहे. त्यांना देखील अनुदान मिळावे व 2023-24 चा खरीप पिक विमा ज्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यांना देखील त्वरित पिक विमा मिळावा तसेच बांगलादेश संत्रा आयात कर कमी करावा याकरिता आपण आपले स्तरावर शासनास पाठपुरावा करून त्वरित सर्व प्रश्न निकाली काढावे अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी हिवरखेड येथे चक्काजाम आंदोलनास बसणार असल्याचे निवेदन आज सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन देण्यात आले. त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, शहर अध्यक्ष राहुल चौधरी, कांचन भाऊ कुकडे, किशोर भाऊ जिचकार, दिनेश भाऊ घोरमाडे, मनीष गुडधे, मायाताई वानखडे, विनोद गुडघे ,अनिकेत उबाळे, प्रकाश राऊत, अंबादास गुडधे, विनोदराव गुडधे राहुल ठोके, दिनेश गांजरे, ओंकार काळे, बाबाराव खाटगडे ,विनोद पांढरे, प्रमोद भाकरे, नरेंद्र राऊत, विनोद खटघडे, प्रकाश डगवार, मनोहर राणे, गजानन भामकर ,राहुल गावंडे, विकास बोराळकर, शरद काटोलकर ,उत्तम उपाशे, प्रमोद हरणे सह पाळा डोंगर यावली हिवरखेड दापोरी रिद्धपूर घोडदेव सह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here